मंगलवार, 30 सितंबर 2008

शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेवच

पुणे, ३० सप्टेम्बर- छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी कोंडदेव होते, हे सांगणारे इतिहासात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर यांनी सोमवारी केला। शहाजी राजांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी आधीच्या पुरस्कारातून दादोजी कोंडदेव यांचे नाव काढून टाकणे गैर आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का नव्हते, हे निष्कर्ष पुरस्कारासाठी लावणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काही मोजक्या व्यक्ती आणि संघटनांच्या दडपणाखाली सरकारने समिती नेमली असून त्यांच्या अभ्यासावर आधारित चुकीचे निर्णय सरकार घेत असल्याची टीका बलकवडे यांनी केली. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिकवल्याचे उल्लेख असून त्याकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीत परस्परच नेमणूक केली असून आपल्याला याबद्दलची माहिती वृत्तपत्रातूनच कळाली असल्याचे मेहेंदळे आणि बेडेकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे कोणतेही लेखी पत्र किंवा साधा फोनही अधिकृतरित्या केला नसल्याचे ते म्हणाले. या समितीत १५ अभ्यासक असून यातल्या १० जणांना इतिहासातले काहीही कळत नसल्याचे बेडेकर यांनी नमूद केले. ज्यांना फारसी, मोडी आणि पशिर्यन येत नाही ते कसले अभ्यासक असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकार संशोधनात जातीयवाद आणत असून दादोजी कोंडदेव ब्राह्माण होते म्हणूनच त्यांचे नाव बाजूला करण्याचा घाट काही संघटना आणि व्यक्तींनी घातला असल्याचे मेहेंदळे म्हणाले. या सर्व घटनांचा संशोधनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


चामुंडादेवी चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे आदेश

जोधपूर, ३० सप्टेंबर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चामुंडादेवी चेंगराचेंगरी कांडानंतर चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
जखमींनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत देण्यात येईल. राजे यांनी मेहरनगढ भागातील घटनास्थळी भेट दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्यास चौकशी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मालेगांव बळींना सरकारची मदत जाहीर

मुंबई, ३० सप्टेंबर- महाराष्ट्र सरकारने मालेगाव बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना पन्नास हजार तर तुरळक जखमींना पंचवीस हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख युरोपच्या दौऱ्यावर असून स्फोटात जखमी झालेल्या पोलिसांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मालेगावात काल रात्री वर्दळीच्या भिक्कू चौक भागात झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला तर सत्तर जण जखमी झाले आहेत.

सोमवार, 29 सितंबर 2008

राष्ट्रपतींच्‍या दौ-यात स्फोट, चार जवान शहीद

छत्तीसगड, २९ सप्टेम्बर-राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्‍या दौ-यादरम्यान छत्तीसगडच्‍या बस्तर जिल्‍ह्यातील पर्यटन स्थळ चित्रकोट येथे नक्सलवाद्यांकडून केल्‍या गेलेल्‍या भुसूरंगाच्‍या स्‍फोटात केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान शहीद झाले.
स्फोटामुळे जीपमध्‍ये असलेले दोन जवान घटनास्‍थळीच शहीद झाले तर आणखी दोघांचा उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला.

रविवार, 28 सितंबर 2008

बांगलादेशी घुसखोरांना अटकाव घाला: अडवाणी

गुवाहाटी, २८ सप्टेंबर-राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करण्यासाठी पाकच्या आयएसआयवर हल्ला चढवताना भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणार्‍या घुसखोरांना अटकाव घालण्याची गरज व्यक्त केली.
ईशान्येत आयएसआयच्या पुढाकाराने घुसखोरी होते. ईशान्येतील लोकांना त्रस्त करणार्‍या घुसखोरीबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सतर्क होते. दिल्लीत शनिवारी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातील स्फोटके हे बांगलादेशातून आणण्यात आले होते.
देशात याअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटातील स्फोटके आणि दिल्ली स्फोटातील स्फोटकांमध्ये फरक होता। हे बॉम्ब बांगलादेशातून पाठवण्यात आले होते.
घुसखोरी ही फक्त आसामच्या अस्तित्वास धोका नसून देशाच्या सुरक्षेसही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आसाममधील मुस्लिमांना त्यांनी सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले.

बुधवार, 24 सितंबर 2008

मुंबईत 5 दहशतवाद्यांना अटक

मुंबई, २४ सप्टेंबर- मुंबई पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागाने केलेल्‍या एका कारवाईत इंडियन मुजाहिदीनच्‍या ५ सदस्‍यांना अटक करण्‍यात आली. अटक करण्‍यात आलेले उत्‍तर प्रदेशातील दहशतवादी आजमगढ येथील रहिवासी असल्‍याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्‍त हसन गफूर यांनी दिली. मुंबईत घातपात घडवून आणण्‍याचे त्‍यांचे नियोजन होते.
मुंबईतील भिवंडी, गोवंडी आणि मुंब्रा परिसरातून फजलूर रहमान गॅंगसाठी काम करणा-या पाच दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने आज छापे टाकून अटक केली. मोहमद सादीक, अफजल उस्‍मानी, अबू आरीफ, आतीफ बदर आणि मो.जाकीर शेख अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून मोठ्या प्रमाणावर स्‍फोटके, मशीन गन डिटोनेटर आदी जप्‍त करण्‍यात आले आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्‍तानात प्रशिक्षण दिले गेले असल्‍याची माहिती समोर आली आहे. अटक करण्‍यात आलेल्‍यांपैकी ४ जणांना मुंबईतून तर अफजलला आजमगढ येथून अटक करण्‍यात आली आहे.
या दहशतवाद्यांचे संबंधही आजमगढशीच असल्‍याची माहिती समोर आली असून इंडियन मुजाहिदीनसाठी ते काम करीत होते. २००५ पासून दहशतवादी कारवायांमध्‍ये या सर्वांचा सहभाग आहे. अहमदाबाद व सूरत शहरात बॉम्‍ब ठेवण्‍यात आणि धमकीचा ई-मेल पाठविण्‍यात त्‍यांचा सहभाग आहे. अटक करण्‍यात आलेल्‍यांपैकी सादीक हा इंडियन मुजाहिदीनचा फाऊंडर मेंबर आहे. तर दोघे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुंबई पोलीस व दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्‍या संयुक्‍त कारवाईचा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अभिनंदन केले असून कारवाईत सहभागी पथकाला ५ लाखांचे पारितो‍षिक जाहीर केले आहे.
दरम्‍यान, कर्नाटकचा रोशन खान हा फरार असून त्‍याचा शोध सुरू आहे. तर या सर्व दहशवाद्यांवर नियंत्रण ठेवणारा आमीर रजा नावाचा दहशवादी पाकिस्‍तानात लपून असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी कारवायांसाठी हवालाच्‍या माध्‍यमातून पैसे मिळत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सोमवार, 22 सितंबर 2008

मास्टरमाइंड तौकिर मुंबईत?

मुंबई, २२ सप्टेम्बर-राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, बंगळुरूत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकिर मुंबई परिसरातच असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाल्यानं मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. गुजरात आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीनं त्यांनी जोरदार शोधमोहीम हाती घेतलेय.
गेल्या शनिवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर, पोलिसांनी तौकिरच्या शोधासाठी जंग जंग पछाडलंय. तोच या स्फोटांचा मास्टरमाइंड असल्याचं समजतं. त्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत पोलिसांना हवाय. परंतु, त्याचा काहीच ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही. दिल्ली स्फोट प्रकरणी, एन्काउंटर झाल्यानंतर, ब-याच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण त्यांच्याकडूनही तौकिरबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
असं असतानाच, तौकिर मुंबईजवळ असल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली असून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तौकिरसोबत आणखी दोघं असू शकतात. सागरी मार्गानं ते पळून जाण्याची शक्यता असल्यानं समुद्रकिना-यांवर नाकाबंदी करण्यात आलेय. मुंबई, दिल्ली आणि गुजरात पोलिस तौकिरला अटक करू शकले, तर सगळ्याच बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा होणार आहे. ते खूप मोठं यश असेल.

रविवार, 21 सितंबर 2008

भावना भडकावू नका; नोकऱ्या द्या

पुणे, २१ सप्टेम्बर-मराठीच्या नावावर तरुणांना भडकावण्यापेक्षा तुम्हीच त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्या, असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे किंवा मनसेचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मॅक्स टेलिकॉम यांच्या सहकार्याने पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तांत्रिक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर अपर्णा डोके आदी उपस्थित होते.
सध्या वाढत्या स्पधेर्त प्रत्येक तरुणाला नोकरी मिळणे अवघड झाले आहे. यासाठी तरुणांनी तांत्रिक शिक्षणाकडेही वळायला हवे असे पवार यावेळी म्हणाले. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश संपादन करायचे त्यासाठी ध्येय समोर ठेवून कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

शनिवार, 20 सितंबर 2008

कसारा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

नाशिक, २० सप्टेम्बर- नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होताच, त्यातच काल मध्यरात्री कसारा घाटात लतिफवाडी येथे दरड कोसळल्यानं तिथे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरही वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली आहे.
गेल्या चार तासांपासून संपूर्ण कसारा घाटात ट्रॅफिक जॅम झाले असून वाहतूक कासवगतीने सुरू आहे. परंतु, रस्त्यावरचा मातीचा ढीगारा बाजूला करण्याचं काम सुरू असून आणखी तासाभरात वाहतूक सुरळीत होईल, असे समजते.

शहीद निरीक्षक शर्मांवर अंत्‍यसंस्कार

नवी दिल्ली, २० सप्टेंबर- नवी दिल्‍लीतील जामिया नगर येथे झालेल्‍या एन्‍काउंटरमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या स्‍पेशल सेलचे निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्‍यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.
मोहनचंद शर्मा शुक्रवारी जामिया नगर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. या हल्‍ल्‍यात एका दहशतवाद्याला पकडण्‍यात आले असून दोघांना ठार करण्‍यात आले आहे. दिल्लीच्‍या एम्स रुग्‍णालयात शवचिकित्‍सेनंतर त्‍यांचे पार्थिव घरी नेण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर निगमबोध येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आला.

शहीद निरीक्षक शर्मांवर अंत्‍यसंस्कार

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर- नवी दिल्‍लीतील जामिया नगर येथे झालेल्‍या एन्‍काउंटरमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या स्‍पेशल सेलचे निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्‍यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.
मोहनचंद शर्मा शुक्रवारी जामिया नगर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. या हल्‍ल्‍यात एका दहशतवाद्याला पकडण्‍यात आले असून दोघांना ठार करण्‍यात आले आहे. दिल्लीच्‍या एम्स रुग्‍णालयात शवचिकित्‍सेनंतर त्‍यांचे पार्थिव घरी नेण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर निगमबोध येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आला.

गुरुवार, 18 सितंबर 2008

'मिहान'मध्ये मराठी माणसाला स्थान पाहिजेचः राज

मुंबई, १८ सप्टेम्बर-विदर्भाला नवी ओळख मिळवून देऊ शकणा-या ' मिहान ' सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मराठी माणसाला योग्य स्थान मिळायलाच पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन पुकारेल, असा इशारा अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
आज नागपुरातून राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झाला. त्यात राज यांनी सुरुवातीला, जागतिक दर्जाच्या मिहान प्रकल्पाची माहिती घेतली. नागपूरसह विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची सुवर्णसंधी म्हणून मिहानकडे बघण्यात येत आहे. त्यातून नागपूरच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे, कारण या प्रकल्पांतर्गत माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग, सेवा उद्योग, आयात-निर्यात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जातेय. तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे होणारी उलाढाल अवाढव्य असेल. त्यामुळे सुमारे चार लाख रोजगार उलपब्ध होणार आहेत.
मिहान प्रकल्पातल्या रोजगारांमध्ये मराठी माणसाला प्राधान्यानं स्थान मिळालं पाहिजे, असे राज यांनी ठणकावून सांगितले। तिथेही जर आम्हाला डावललं गेलं तर मनसे हा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानं, हा दौराही गाजणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हा दौरा २३ तारखेपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना २० तारखेला शिक्षा सुनावली जाणार असताना, राज ठाकरे भंडा-यातच आहेत.

बुधवार, 17 सितंबर 2008

जागतिक वित्तीय संकटापासून भारत पूर्णत: सुरक्षित राहू शकत नाही: अनिल अंबानी

मुंबई, १७ सप्टेम्बर- जागतिक अर्थव्यवस्थेशी भारतीय अर्थव्यवस्था जोडली गेलेली असल्यामुळे जागतिक वित्तीय संकटापासून भारत पूर्णत: सुरक्षित राहू शकत नाही, असा इशारा 'रिलायन्स कॅपिटल'चे अध्यक्ष व 'एडीएजी' समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांनी मंगळवारी दिला. 'लेहमन ब्रदर्स'चे निघालेले दिवाळे, आथिर्क संकटातून सुटण्यासाठी 'मेरिल लिंच'ने केलेली स्वत:ची विक्री या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
कंपनीच्या वाषिर्क सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी म्हणाले : भारतातील शेअर बाजार आणि परकीय चलन बाजारांवर जागतिक, अमेरिकेतील घडामोडींचे परिणाम आताच दिसू लागले आहेत। मात्र त्यांची तीव्रता कमी प्रमाणात असेल. याचे कारण आहे आपल्या धोरणर्कत्यांनी, सरकारांनी स्वीकारलेले सावध, टप्प्याटप्प्यांनी आथिर्क सुधारणा अमलात आणण्याचे नेमस्त धोरण!
अमेरिकेच्या कर्जपेठेतील पेचप्रसंगाने वित्तीय बाजारातील बड्या कंपन्यांचा बळी घेतला आहे. वाढती देशांतर्गत भाववाढीची चढती कमान, खूपच दोलायमान बनलेले शेअर बाजार यांमुळे ग्राहकांचा खर्च करण्याची क्षमता घटली असून सर्वच क्षेत्रांत विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. पण सुदैवाने देशांतर्गत मागणी आणि गुंतवणुकीच्या बळावर आपण जागतिक मंदीच्या झंझावातापासून सहीसलामत राहू, असे अंबानी पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)

मराठा आरक्षणाचा सहानुभूतिपूर्वक विचार: देशमुख

मुंबई, १७ सप्टेंबर- राज्यातील मराठा जातीला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच राज्य सरकार याचा सहानुभूतिपूर्वक विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली.
याविषयावर अधिक मंथन करण्याची गरज नसून, लवकरच याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याविषयाची माहिती राज्य सरकार जमवत असून, इतर कोणत्याही जातीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंगलवार, 16 सितंबर 2008

राज ठाकरे यांची वकिलांना आर्त हाक!

मुंबई, १६ सप्टेम्बर-मुंबईत झालेल्या ७/११ बॉम्बस्फोटातील आरोपींचे वकील पत्र घेणा-या वकिलांना आपल्या ठाकरी भाषेत ठणकावणारे राज ठाकरे यांची भाषा आता मृदू झाली आहे. त्यांनी या आरोपींचे खटले लढणा-या वकिलांना भावनिक आवाहन करून अशा केस घेवू नये असे सांगितले आहे. या संदर्भातील पोस्ट आता मुंबईच्या विविध ठिकाणी लावले आहेत.
२००६ मध्ये राज ठाकरे यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपींचे वकील पत्र घेणा-या वकीलांना धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याचे अनेक खटले दाखल करण्यात आले. मात्र, आता दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना कायद्याची जाण झाली आहे. त्यांनी आपली मागणी कायम ठेवली. मात्र, गांधीगिरी करून ते वकिलांना भावनिक आवाहन करीत आहेत.
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटनंतर मनसेतर्फे विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात बॉम्ब स्फोटाच्या आरोपींच्या वकिलांचा विरोध करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये एका चिमुड्याला आपल्या मृत आईसमोर रडताना दाखवलं आहे. त्याच्या शेजारी असलेल्या मजकूरात म्हटले आहे की, वकील साहेब, आम्हांला तुमचा गर्व आहे. तुम्ही बॉम्ब स्फोटातील आरोपींसाठी लढत आहात. पण हे सांगा जे बॉम्ब स्फोटात मारले गेले त्या आमच्या कुटुंबाचा काय दोष होता. त्यांना न्याय कोण देणार ? आमचे कुटुंब आम्हांला परत द्या.
वकिलांनी वकिली करताना काही गोष्टींच भान राखावं असा सल्ला देत या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, बॉम्ब स्फोटात मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर उभे राहून तुम्ही तुमचे स्थान उंचावू नका. मनसेचे सचिव चिंटू शेख यांनी हे पोस्टर लावले आहे.
चिंटू शेख यांची बहिण शाहीन ही सुद्धा पेशाने वकील आहे. पेशा आणि वैयक्तीक मत यात नेहमी फरक करायला हवे. मात्र, असा विषय असेल तर वकीलांनी बॉम्बस्फोटांच्या आरोपींच्या केस घेवू नये. माझ्या भावाच्या मताशी मी सहमत असल्याचे शाहीन हीने सांगितले.

सोमवार, 15 सितंबर 2008

दहशतवाद्यांचे पुढचे टार्गेट मुंबई?

मुंबई, १५ सप्टेम्बर- मुंबई जयपुर , अहमदाबाद, बंगळुरू आणि नवी दिल्लीनंतर दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणा-या इंडियन मुजाहिदीनने आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लक्ष्य करण्यीच धमकी दिली आहे.
चार महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आता पर्यंत सुमारे १३० लोकांनी प्राण गमावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मुंबई पोलिसच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) मुस्लिमांना विनाकारण त्रास दिला आहे. त्यामुळे हे हल्ले करण्यात आल्याचे इंडियन मुजाहिदीन केलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुस्लिमांवर होणा-या या अत्याचारावर इंडियन मुजाहिदीनची करडी नजर असल्याचंही या नमूद केलं आहे.
या दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या इमेलमध्ये लिहिले आहे की, तुम्हांला माहिती पाहिजे की तुम्ही जे काही करतायं ते आम्हांला माहित आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. योग्य वेळीची आम्ही वाट पाहत आहोत. अंसारनगर आणि अंधेरीतील मोगरापाडा भागात मध्यरात्री मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जाणून बूजून मुस्लिमांवर कारवाई करण्यात आली.
चौकशी करताना मुस्लिम महिला आणि मुलांशी ज्या प्रकारे वागणूक दिली जाते. त्याची किंमत मुंबईतील लोकांना आपले प्राण गमावून द्यावी लागणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुंबईच्या एटीएस विभागाला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील आहे, असेही या मेलमध्ये लिहिलेलं आहे. राजस्थानचे उपपोलिस महानिरीक्षक ए. के. जैन यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
ईमेलमध्ये गुरुअलहिंदी आणि अल-अरबी या दोन नावांनी सह्या केल्या आहे.

शुक्रवार, 12 सितंबर 2008

मराठमोळ्या सोनालीने घेतली जयाची बाजू

मुंबई, १२ सप्टेंबर- मराठी बाण्‍यासाठी राज ठाकरे यांनी जगभर रान माजविले असताना आता चक्‍क मराठमोळ्या सोनाली बेंद्रे हिने राज यांचे आंदोलन चुकीचे असल्‍याचे सांगून त्‍यांना घरचा आहेर दिला आहे। सोनालीच्‍या मते तिचे यजमान गोल्‍डी बहल यांच्‍या 'द्रोण' या चित्रपटाच्‍या संगीत रिलीज कार्यक्रमात जया बच्चन यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यात आक्षेपार्ह असे काहीही नव्‍हते. त्‍याचा उगाच माध्‍यमांकडून आणि राजकारण्‍यांकडून बाऊ केला गेला.
सोनालीने जया बच्चन यांची बाजू घेताना सांगितले, की जे लोक जया यांना ओळखतात त्‍यांना चांगले माहीत आहे की जयाजींच्‍या टीप्‍पणी मागे कोणताही उद्देश नव्‍हता. आपण त्‍यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्‍या अशा प्रकारचे वक्‍तव्‍य करणार नाहीत अशी खात्री तिने व्‍यक्‍त केली आहे.

मुंबई आमच्या बापाचीच! दिवाकर रावते

मुंबई, १२ सप्टेम्बर- ' मुंबई ही आमच्याच बापाची असून ती तुमच्यासारख्या घटनेच्या आधारे आक्रमण करणाऱ्या परप्रांतियांची तर मुळीच नाही. त्यामुळे कृपया आपल्या वदीर्ची गुर्मी घेवून लवकरच महाराष्ट्रातून दिल्लीसारख्या मुक्कामी जावे', अशी टीका शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांना केली आहे,
' मुंबई कुणाच्या बापाच्या नाही,' अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या के. एल. प्रसाद यांना रावते यांनी पत्र पाठवले असून त्यात ही सूचना केली आहे. आपण पोलिस खात्यात असूनही गावगुंड वापरतात तसली भाषा वापरून मुंबईकरांचा घोर अपमान केल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
' एखाद्याचा बाप काढणे हे महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. पोलिसांच्या पदाची आणि वदीर्ची माहिती सर्वांनाच आहे. मात्र या पदावर असताना मुंबईकरांचा बाप काढणे, हे एवढे तुम्हाला सोपे वाटते का? यालाच अधिकाराचा अहंकार व वदीर्ची मस्ती म्हणतात', असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

गुरुवार, 11 सितंबर 2008

बच्चन कुटुंबियांविरुद्ध राज'बंदी' मागे

हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह धरणार्‍या खासदार जया बच्चन यांच्याविरोधात रणशिंग फूंकण्‍याचे आदेश दिलेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी आपले बच्चन कुटुंबिय विरोधातील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली असून, अमिताभ यांना देशाच्या कोणत्याही सीमा नाहीत, त्यांनी माफी मागितल्याने आपण आपले आंदोलन मागे घेत असल्याचे राज यांनी आज जाहीर केले.
'हम यू पी वाले है। हम हिंदी में ही बात करेंगे असे जया यांनी द्रोण चित्रपटाच्या म्युझिक रिलीज प्रसंगी म्हटले होते। यानंतर मनसेने यावर आक्षेप घेत राज यांनी बच्चन कुटुंबियांविरोधात आंदोलन करण्‍याचा निर्णय घेतला होता.
राज यांनी पत्रकार परिषद घेत जया यांच्यावर तोफ डागत आधी त्यांनी माफी मागावी आशी मागणी केलीर होती. जया आणि अमिताभ यांनी याविषयी मराठी जनतेची माफी मागितल्यानंतर आज राज यांनी आपण बच्चन कुटुंबियांविरोधात आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मंगलवार, 9 सितंबर 2008

'बोलण्यापूर्वी मी विचार करायला हवा होता'- जया

मुंबई, ९ सितम्बर- 'हम युपीवाले है, हिंदी में ही बोलेंगे, असे म्हणता नव्या वादाला जन्म घालणाऱ्या अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना राज ठाकरे यांनी मराठी झटका दाखविल्यानंतर अखेर उपरती झाली आहे। आपण हे वक्तव्य करण्यापूर्वी विचार करायला हवा होता। पण या वक्तव्यामागे मराठी लोकांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. 'माझ्या बोलण्याने मराठी मानांना वेदना झाल्या असतील तर मी त्यासाठी माफी मागते असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्न केला.
शनिवारी 'द्रोण' या चित्रपटाच्या म्युझिक अल्बमच्या अनावरणप्रसंगी, बोलताना त्यांनी काहीही गरज नसताना मध्येच उठून ' मै यूपी वाली हूं और, हिंदी में ही बात करुंगी. महाराष्ट्र के लोग मुझे माफ करे' असे वक्तव्य केले होते. यानंतर या प्रकरणावरुन राज्यात राजकाणाला सुरुवात झाली होती. मनसेने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांचा विरोध सुरु केला होता। शिवसेनेही त्यावर टीका केली होती. पण राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन बच्चन कुटुंबियांच्या चित्रपटांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात येईल. ते प्रदर्शित करू दिले जाणार नाहीत, असे जाहीर केले, असा इशारा दिला. त्यानंतर मग जया बच्चन यांना आपल्या चुकीची जाणीव झाली.
तोपर्यंत राज समर्थकांनी मुंबईत प्रत्यक्ष कृतीस सुरुवात करून बच्चन कुटुंबियांची पोस्टर्स फाडली. त्यांच्या चित्रपटांची, जाहिरातींची पोस्टर्स, होर्डिंग्ज तोडायला सुरवात केली. मग मात्र जया यांना आपण काय बोललो याचे भान आले आणि त्यांनी सरळ माफीनामा जाहीर करून टाकला. आपण मराठीही चांगले बोलू शकतो. हवे तर याची परीक्षाही घ्या, असे सांगत त्यांनी आपले मराठीप्रेमही व्यक्त केले.

शनिवार, 6 सितंबर 2008

नितेश राणे यांच्यावर हल्ला

कांदिवली, ६ सप्टेम्बर- महसूलमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री समतानगर येथील ठाकूर कॉलेज जवळ काही तरूणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.
ठाकूर कॉलेज येथील एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त नितेश राणे आले होते. त्यावेळी स्थानिक तरूण आणि स्वाभिमानच्या कर्यकर्त्यात बाचाबाची झाली. नितेश राणे हे स्वाभिमान या संघटनेचे प्रमुखही आहेत. बाचाबाचीनंतर नितेश राणे तेथून जाण्यासाठी निघाले होते, त्यावेळी त्यांच्या गाडीवर मागून काही लोकांनी दगड फेकले आणि गाडीच्या काचा फोडल्या.
मात्र, नितेश यांना कोणतीही इजा झाली नसून ते या हल्ल्यातून सुखरूप बचावले असल्याचे समतानगर पोलिसांनी सांगितले.

शुक्रवार, 5 सितंबर 2008

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांचा निकाल आज

नवी दिल्ली, ६ सप्टेम्बर-गेले काही दिवस राजकीय पक्षांचे लक्ष असलेल्या दिल्ली विद्यापीठ विद्याथीर् संघाच्या निवडणुकीचे मतदान शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पार पडले. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १० उमेदवार मैदानात होते. मात्र खरी स्पर्धा एनएसयूआयची सोनिया सप्रा आणि अभाविपची नुपूर शर्मा या दोन विद्याथिर्नींमध्येच असल्याचे स्पष्टपणे जाणवले. निकाल शनिवारी जाहीर होणार आहे.
राजधानीतील ५१ महाविद्यालयांच्या सुमारे ८० हजार विद्याथीर् या निवडणुकीशी संबंधित आहेत.
यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजपच्यादृष्टीने देखील अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशा चार प्रमुख जागांसाठी एकूण ३० उमेदवार मैदानात आहेत.
लागोपाठ ५ वषेर् तिरंगा फडकवणाऱ्या एनएसयूआयला यंदाही विजयश्ाी कायम राखायची आहे, तर अभाविपला पुन्हा भगवा फडकवण्याची आकांक्षा आहे. जेएनयुच्या धतीर्वर प्रेसिडेन्शिअल डिबेटचा प्रयत्नही यंदा विद्यापीठात झाला तथापि प्रमुख उमेदवारांचा त्यात सहभाग नसल्याने अपूर्व गोंधळात अवघ्या १५ मिनिटांत हा प्रयोग आटोपता घ्यावा लागला.

राष्ट्रपती शनिवारी विदर्भाच्या दौर्‍यावर

मुंबई, ५ सप्टेम्बर- राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे उद्या (शनिवारी) विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. शहरात विविध ठिकाणी शिलान्यास कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अमरावती येथून सुरू होणाऱ्या नवीन रेल्वेस हिरवी झेंडी दाखवतील.
विशेष विमानाने त्यांचे नागपूर येथे साडेदहा वाजता आगमन होईल. यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व राज्यपाल एस सी जमीर त्यांचे स्वागत करतील. राष्ट्रपती येथून अचलपूरसाठी रवाना होतील, मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत असतील.

पूरग्रस्त बिहारसाठी मदतीचे आवाहन

मुंबई, ५ सप्टेम्बर- बिहार सध्या इतिहासातील सर्वात भीषण अशा पूराचा सामना करीत आहे. राज्यातील बहुतेक जिल्हे पाण्याखाली गेले असून सुमारे पंधरा लाख लोक बेघर झाले आहेत. या लोकांनी केवळ घरच नाही तर उत्पन्नासह सर्व काही गमावले आहे. पूरग्रस्त बिहारसाठी मोठ्या प्रमाणात मदतकामाची आवश्यकता आहे.
' दैनिक वृत्त सेवा (DNS) मराठी' आपल्या वाचकांना पूरग्रस्त बिहारसाठी मोठ्या मनाने 'मुख्यमंत्री मदत निधी'ला मदत करण्याचे आवाहन करीत आहे। मदत करणाऱ्यांना आयकराच्या ८०जी(२) अंतर्गत करसवलत मिळेल. आपल्या मदतीचे चेक/ड्राफ्ट 'मुख्यमंत्री मदत निधी' या नावाने काढून पुढील पत्त्यावर पाठवावा. तो पाटणा येथील बँकेत वटणारा असावा. पत्ता : मुख्यमंत्री मदत निधी, मुख्यमंत्री बिहार, सचिवालय, ४ देशरत्न मार्ग, पाटणा ८००००१.
तुम्ही कम्प्युटरवरून ऑनलाइनही मदत पाठवू शकता. त्यासाठी बँक अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे : मुख्यमंत्री मदत निधी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पाटणा सचिवालय शाखा, अकाऊंट नं. १०८३९१२४९२८.

गुरुवार, 4 सितंबर 2008

विजय दर्डा यांच्याकडून वसुली करण्याचा आदेश

मुंबई, ४ सप्टेम्बर-खासदार विजय दर्डा यांनी खासदार निधीचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले असून या रकमेची वसुली करण्याचा आदेश केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
लष्करातून निवृत्त झालेल्या आणि यवतमाळच्या जामनकर नगर येथे राहणा-या दिंगबर पाजगडे यांनी विजय दर्डा यांच्याविरोधात खासदार निधीचा गैरवापर केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई हाय कोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी दरम्यान सुमारे ३४ लाख ५३ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर केंद्र सरकारने वसुलीचे आदेश दिले.

विजय दर्डा यांच्याकडून वसुली करण्याचा आदेश

मुंबई, ४ सप्टेम्बर-खासदार विजय दर्डा यांनी खासदार निधीचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले असून या रकमेची वसुली करण्याचा आदेश केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
लष्करातून निवृत्त झालेल्या आणि यवतमाळच्या जामनकर नगर येथे राहणा-या दिंगबर पाजगडे यांनी विजय दर्डा यांच्याविरोधात खासदार निधीचा गैरवापर केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई हाय कोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी दरम्यान सुमारे ३४ लाख ५३ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर केंद्र सरकारने वसुलीचे आदेश दिले.

बुधवार, 3 सितंबर 2008

अणुकरारात बुश यांच्याकडून भारताची दिशाभूल?

वॉशिंग्टन / व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), ता. ४ - अणुइंधन पुरवठा गटाच्या (एनएसजी) आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या तोंडावर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी लिहिलेल्या "गोपनीय' पत्राच्या गौप्यस्फोटाने डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या पोटात भीतीचा गोळा उठला.
अणुचाचणीचा भारताचा हक्क अबाधित नाही आणि अखंडित अणुइंधन पुरवठ्याचे अमेरिकेवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही, असे बुश यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हे पत्र नऊ महिने जुने असून ते डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार कोसळू नये, याकरिता चक्क "दडवून' ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, या पत्रातील तपशील डॉ. सिंग यांना माहीत होता की नाही, याबाबत ठोस समजू शकलेले नाही.
"एनएसजी'ने आजच्या बैठकीत अणुकराराला हिरवा कंदील द्यावा, यासाठी बुश प्रशासन आणि डॉ. सिंग यांचे सरकार अक्षरशः धडपडत असतानाच हे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या पत्रातील आशयानुसार, अणुकरारासाठी अमेरिकेने भारताला "सवलती' नव्हे, तर बऱ्याच कठोर अटी लादल्या असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. अणुकरारातील काही महत्त्वाच्या कलमांचा भारताने जो अर्थ काढला आहे, नेमका त्याच्या विपरीत असा अर्थ बुश प्रशासनाने लावला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकीकडे बुश यांनी भारताची दिशाभूल केली, तर दुसरीकडे डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला अंधारात ठेवले, असा आरोप करण्यास डावे पक्ष आणि भाजपने सुरवात केली आहे. यामुळे डॉ. सिंग यांचे सरकार अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हे पत्र बुश यांनी प्रतिनिधी गृहाच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष हावर्ड बर्मन यांना लिहिले आहे. बर्मन यांनी अणुकराराबद्दल ४५ प्रश्‍न विचारले होते. त्याला बुश यांनी १६ जानेवारी रोजी उत्तर दिले. मात्र, ते पत्र तब्बल नऊ महिने "दडवून' ठेवण्यात आले. स्वतः बर्मन यांनी "वॉशिंग्टन पोस्ट' या प्रख्यात दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, "हे पत्र सार्वजनिक केले तर डॉ. सिंग यांचे सरकार कोसळेल, अशी भीती परराष्ट्र मंत्रालयाला वाटत असल्याने त्यांच्या विनंतीनुसार मी ते सार्वजनिक केले नाही. मात्र, जर उद्या "एनएसजी'ने मान्यता दिलीच तर ते अमेरिकन कॉंग्रेससमोर येईल. तेव्हा सर्व सदस्यांना वस्तुस्थिती माहिती व्हावी, यासाठी आपण हे पत्र आताच सार्वजनिक करत आहोत.'
ऑगस्ट २००७ मध्ये डॉ. सिंग यांनी संसदेत केलेल्या भाषणामध्ये अनेक शंकांचे, आक्षेपांचे निराकरण केले होते. ""अणुचाचणी घेण्याचा भारताचा हक्क कोणत्याही स्थितीत अबाधित आहे आणि अणुइंधनाचा पुरवठा अखंडितच राहील,'' असा दावा त्यांनी केला होता. आता बुश यांच्या स्पष्टीकरणानुसार, तशी स्थिती नसल्याचा अर्थ ध्वनित होत आहे. विशेष म्हणजे बुश यांचे पत्र जानेवारीमधील आहे आणि डॉ. सिंग यांनी संसदेत ऑगस्टमध्ये भाषण केले होते. त्यामुळे बुश यांच्या पत्राचा तपशील त्यांना होता की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगलवार, 2 सितंबर 2008

सेंसेक्स में उछाल सूचकांक १५ हजार के पार

मुंबई, २ सितंबर- कच्चे तेल के पिघलने के साथ ही बैंकिंग, रियलटी, ऑइल एंड गैस और इंजीनियरिंग क्षेत्र की कंपनियों के शेयरों में निवेशकों के जोरदार समर्थन के बीच देश के शेयर बाजारों ने आज लंबी छलाँग लगाई।
बम्बई शेयर बाजार (बीएसई) का सेंसेक्स ५५३ अंक उछलकर २० दिन के अंतराल के बाद फिर 15 हजार अंक से ऊपर निकल गया। नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) का निफ्टी १५५ अंक की दौड़ से ४५०० अंक से ऊपर बंद हुआ। एशियाई शेयर बाजारों में गिरावट के बावजूद यहाँ शुरू से ही मजबूती का रुख रहा।
गुस्ताव तूफान की रफ्तार धीमी पड़ जाने से नुकसान कम होने की उम्मीद के चलते कच्चा तेल आज चार माह के निम्नस्तर १०५.४६ डॉलर प्रति बैरल तक लुढ़क गया। विश्लेषक उम्मीद कर रहे हैं कि अमेरि‍का और चीन जैसी विश्व की बड़ी अर्थव्यवस्थाओं में ईंधन की माँग कम होने से कच्चे तेल के दाम और गिर सकते हैं।
बाजार सूत्रों के मुताबिक विदेशी संस्थान फिर से सक्रिय होते नजर आ रहे हैं। इसे देखते हुए पिछले तीन कारोबारी दिवसों में यह दूसरा मौका है कि सेंसेक्स ने ५०० अंक से अधिक की छलाँग लगाई है। शुक्रवार को भी सेंसेक्स ५१६ अंक बढ़ा था।
सेंसेक्स कल के १४४९८.५१ अंक की तुलना में १४६०९.४४ अंक पर खुला और नीचे में १४५४३.२१ अंक तक गिरने के बाद लिवाली की लहर में इसकी तुलना में ५६३ अंक बढ़कर ऊपर में १५१०६.१५ अंक तक जाने के बाद समाप्ति पर कुल ५५२.९४ अंक अर्थात ३.८१ प्रतिशत की छलाँग के साथ १५०५१.४५ अंक पर बंद हुआ।
तेरह अगस्त के १५०९३ अंक के बाद सेंसेक्स फिर १५००० अंक से ऊपर निकला। एनएसई का निफ्टी १५५.३५ अंक अर्थात ३.५७ प्रतिशत की बढ़त से ४५०४ अंक पर पहुँच गया। बीएसई के अन्य सूचकांकों में मिडकैप और स्मालकैप में क्रमश: ९१.५९ तथा ८९.०८ अंक की बढ़त रही। यह सूचकांक समाप्ति पर क्रमश: १.६० तथा १.२९ प्रतिशत बढ़त से ५८३३.५७ और ६९८०.४७ अंक पर बंद हुए।
ब्याज दरों में फिलहाल और बढ़ोतरी की संभावनाएँ कम होने से बीएसई के बैंकेक्स ने ४२०.५८ अंक की छलाँग लगाई। कैपीटल गुड्स का शेयर ४४२.०६ अंक और रियलटी ३५१.३६ अंक ऊपर रहा। ऑइल एंड गैस ३५१.५२ अंक, मैटल १६४.०५ अंक तथा आईटी ११०.१७ अंक ऊँचा बंद हुआ। निफ्टी मिडकैप में १.९५ प्रतिशत निफ्टी जूनियर में ३.६८ प्रतिशत का उछाल आया।

ज्येष्ठ वकील विनायकराव वालावलकर यांचे कोर्टातच निधन

मुंबई, २ सप्टेम्बर- हायकोर्टातील ज्येष्ठ वकील विनायकराव वालावलकर (८८) यांचे सोमवारी दुपारी हायकोर्टात युक्तिवाद करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
न्या. आर. एम. सावंत यांच्या कोर्टात ते एका प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी आले होते. दुपारी भर कोर्टातच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या निधनाने कोर्टाचे कामकाज दोन तासांसाठी तहकूब करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन कन्या आहेत. त्यांचा मुलगा नरेंद वालावलकर हेसुद्ध ज्येष्ठ वकील आहेत. त्यांच्यावर दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वालावलकर हे शहर दिवाणी कोर्टात काही काळ न्यायाधीशही होते. आणीबाणीच्या काळात १९७५ मध्ये त्यांना तुरुंगवासही झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी विविध महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये काम पाहिले होते. ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे काही काळ सदस्यही होते.

"टॅप' केलेले संभाषणही "मोका'नुसार पुरावाच- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, २ सप्टेम्बर- दोन व्यक्तींमधील कोणतेही "टॅप' केलेले संभाषण हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोका) पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल, असा नवा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणे आता पोलिसांना अधिक सोपे होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सन २००३ मध्ये संभाषण हा पुरावा ठरू शकत नसल्याचा निकाल दिला होता। त्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निकाल रद्द केला. संशयित आरोपींचे संभाषण "टॅप' करणे आणि ते पुरावा म्हणून वापरणे, या दोन्ही गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.
"मोका' लावण्यात आलेले आरोपी आणि चित्रपटसृष्टीतील अर्थपुरवठादार भरत शहा, छोटा शकीलचा संशयित साथीदार शमीम मिर्झा अरिफ बेग, जमिनी बळकावणारा संजय पाटील यांच्यासह काही जणांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले होते. गुन्हेगारी टोळ्यांतील आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यासाठी या कायद्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे म्हणणे महाराष्ट्र सरकारने मांडले होते.
गुजरातमध्येही संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कडक कायद्याची मागणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने त्यांना बळच मिळाले आहे.

अतिकुपोषित मुलांसाठी राज्यात बालविकास केंद्रांची स्थापना

चंदगड, २ सप्टेम्बर - सहा वर्षांखालील अतिकुपोषित बालकांना एकत्रित आरोग्य व आहार सेवा देऊन कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी औरंगाबादच्या राजमाता जिजाऊ माता, बालआरोग्य व पोषण केंद्राच्या साह्याने शासनाने बालविकास केंद्राची स्थापना करण्याचे निश्‍चित केले आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यासाठी एक केंद्र स्थापन करण्याचे निर्देश आहेत.
बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासनाने आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत, तरीही काही ठिकाणी कुपोषित मुले आढळत असल्याने तज्ज्ञांच्या मतानुसार ही नवी योजना आखली आहे. नियमित आहार घेऊनही वजन वाढत नसलेल्या बालकांना केंद्रात दाखल करून शास्त्रीय नियमानुसार आहार दिला जाणार आहे.
केंद्रासाठी स्वतंत्र सर्वसोयींनी सुसज्ज इमारत, औषधपुरवठा, त्यासाठीचा निधी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा राबविली जाणार आहे.
किमान पंधरा ते एकवीस दिवसांचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी संबंधित मुलाचे पालक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांनी केंद्रात थांबावयाचे आहे. सात महिने ते तीन वर्षांपर्यंत शिशुगट व तीन ते सहा वर्षांसाठी बालगट करून दररोजच्या वेळापत्रकानुसार गाईचे दूध, साखर, तेल, पाणी, भाजी, उकडलेला बटाटा, दही, अंडी ठराविक प्रमाणात देऊन रोजच्या वजनाची नोंद ठेवली जाणार आहे. बालक घरी जाताना त्याची सर्व माहिती एका कार्डावर देऊन नंतरच्या काळातही ते पुन्हा कुपोषणात जाऊ नये म्हणून अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग सतर्क राहणार आहे.
कुपोषणमुक्त समाजासाठी मातेचा आणि संपूर्ण समाजाचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून, स्थानिक पातळीवर मुलांचे उंचीच्या प्रमाणात वजन निश्‍चित करून सुदृढ, कुपोषित, अतिकुपोषित यादी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांमार्फत केले जात आहे. त्यासाठी शासनाने शास्त्रीय निकष वापरले असून, या तक्‍त्यांचा पुरवठा सेविकेंना केला आहे. या नव्या माहितीनुसार मुलांची श्रेणी निश्‍चित करून कुपोषित मुलांसाठी ही नवी योजना राबविली जाणार आहे.

अमेरिकेत वादळाने हाहाकार

अमेरिका, २ सप्टेम्बर-अमेरिकेच्या लुइझाना प्रांत परिसरात आगामी काही तासात 'गुस्ताव' या समुद्री वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवल्यानंतर या भागात हाहाकार माजला असून, या भागातील लाखो नागरिकांनी सुरक्षीतस्थळी प्रयाण केले आहे.
अमेरिकेत गेल्यावर्षी आलेल्या कॅटरिना या वादळापेक्षा गुस्तावची ताकद अधिक असल्याने बुश प्रशासनानेही नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ताशी १८० किलोमीटर वेगाने हे वारे वाहतात, यानंतर या भागाला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
अनेक भारतीयांनीही याचा धसका घेतला असून, या भागात अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. इतकेच नाही तर या प्रांताचे गव्हर्नरही भारतीय बॉबी जिंदाल हेच असल्याने येथील भारतीयांनाही सुरक्षीतस्थळी हालवण्यात येत आहे.

सोमवार, 1 सितंबर 2008

फुले, बिरासदार व नेहवाल यांना "पुणे फेस्टिव्हल पुरस्कार'

पुणे, १ सप्टेम्बर - पुणे फेस्टिव्हलचे यंदा पाच सप्टेंबरला उद्‌घाटन होणार आहे। राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल, अशी माहिती खासदार सुरेश कलमाडी यांनी दिली.
यंदाच्या वर्षी ज्येष्ठ सिने कलावंत निळू फुले, रुस्तम-ए-हिंद हरिश्‍चंद्र बिरासदार आणि नुकत्याच झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या साईना नेहवाल यांना "पुणे फेस्टिव्हल पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. कविसंमेलनात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल।
यंदाही उद्‌घाटन सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

शिल्पा शेट्टीच्या गाडीवर आठवले समर्थकांची दगडफेक

मुंबई, १ सप्टेंबर - कलर्स वाहीनीवर नुकताच सुरू झालेला रिऍलिटी शो "बिग बॉस'मध्ये रामदास आठवले यांना प्रवेश न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) समर्थकांनी या शोची सूत्रसंचालिका आणि बॉलीवुड नायिका शिल्पा शेट्टी हिच्या गाडीवर लोणावळ्याजवळ दगडफेक केली.
एकता कपूर आणि तुषार कपूर यांच्यासोबतच्या मुलाखत कार्यक्रमाचे लोणावळ्यातील रेकॉर्डींगचे काम आटोपून शिल्पा शुक्रवारी मुंबईकडे निघत असताना, आठवले समर्थकांनी दगडफेक केली.
आपण दलित असल्यामुळे तसेच शिल्पाच्या सांगण्यावरून "बिग बॉस'साठी डावलण्यात आल्याचा आरोप आठवले यांनी केला होता।
मात्र, कार्यक्रमातील पात्रांच्या निवडीत आपला कोणताही हस्तक्षेप नसल्याचे शिल्पाने म्हटले आहे.

भाजी विक्रेत्यांवरील कारवाईमुळे साताऱ्यात तणाव

सातारा, १ सप्टेम्बर- शहरातील एकत्रित भाजी मंडईच्या विरोधात असलेल्या आणि जुन्या भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱ्या पाच जणांवर सोमवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई केली. या भाजी विक्रेत्यांचे सामान आणि भाजीपाला जप्त केल्यानंतर त्यांनी नवीन भाजीपाला आणून रस्त्यावर ओतून दिला.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवीन भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर काही महिला भाजी विक्रेत्या आणि महिला पोलिस कर्मचारी यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यातच लक्ष्मीबाई चाळके नावाची एक महिला बेशुद्ध पडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे सोमवारी सकाळी या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
शहरात जुन्या भाजी मंडईपासून अवघ्या दहा पावलांवर नगरपालिकेने नवीन "महात्मा फुले भाजी मंडई' बांधली आहे। काही भाजी विक्रेत्यांचा त्याला विरोध आहे. त्यांनी सोमवारी सकाळी जुन्या भाजी मंडईतच विक्री करण्यास सुरवात केली. त्यानंतर आठ वाजताच नगरपालिकेचे अधिकारी पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी सामान जप्त करण्यास सुरवात केली.
या कारवाईचा भाजी विक्रेत्यांनी निषेध केला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भाजीपाला जप्त करण्याआधी पंचनामे केले नसतील, तर त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विक्रेत्यांच्या वतीने ऍड. वर्षा देशपांडे यांनी केली.

राज यांच्या मराठीचा रेल्वेलाही धसका

मुंबई, १ सप्टेंबर- मुंबईत राहायचे असेल तर मराठी कंपल्सरीची घोषणा करत उत्तर भाषकांवर टीकेची झोड उडवणाऱ्या मनसे नेते राज ठाकरे यांच्या या मराठी आंदोलनाचा आता रेल्वेनेही धसका घेतला असून प्लॅटफॉर्म ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नावाच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सध्या मुंबईतील विविध प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारचे चित्र असून लवकरात लवकर हे काम पूर्णं करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. इतकेच नाही तर आता मुंबईतील विविध प्लॅटफॉर्मवर 'काम सुरू रस्ता बंद' अशा पाट्याही आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मुंबईत राहायचे तर मराठी आलेच पाहिजे असा आग्रह ठाकरे यांनी धरला असून, यापूर्वी त्यांनी मुंबईतील व्यापाऱ्यांना 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती, ही मुदत काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे राज यांनी आता स्पष्ट केले असून, लवकरात लवकर पुन्हा हे आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.