गुरुवार, 17 जुलाई 2008

उधारीच्या पैशावरून वॉमनची हत्या

डोंबिवली, दि. १७ : उधारीचे पैसे न दिल्याने एका वॉचमेनवर मारल्याची घटना कल्याणात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील हरिहर सोसायटीत राहणारे भोरसिंग कुवर (४५) हे वॉचमेनचे काम करतात. पैशाची हात पसरले. मात्र त्यांचा मित्र पदमसिंग धामी (५३) यांनी गोरेसिंगकडे आधी दिलेले उधारीचे पैसे मागितले. गोरेसिमने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पैसे परत केले नाही. यावरुन या दोघांचा वॉचमेन केबिनमध्ये भांडण सूर झाले. पदमसिंगने त्याच्याजवळील धारदारचाकूने गोरेसिंगवर वार केले. यात गोरेसिंगची जाणीच मृत्यू झाला. महात्मा फुले पोलिसांनी पदमसिंगला हत्येप्रकरणी अटक केली आहे.

सराईत गुडांना सात वर्षाची सक्तमजूरी

नवी मुंबई, दि. १७ : बॅंक दरोडे, लुटमार, खुनी हल्ले, चोरी सारख्यागंभीर गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या चार गुडांना न्यायालयाने सात वर्षांची सक्त मजुरी शिक्षा ठोठावली.करणसिंग चौहान, अजय शर्मा, अरुण उर्फ संजय दगडू डोळशे, हेमंतकुमार शिरमोलीया असे आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र सदाशिव भोगवडे यांच्यावर तुर्भे परिसरात सदर गुडांनी खुनी हल्ला केला होता. सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तुर्भे पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या बांधून सबक पुराव्यासह जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी १००० हजार रुपयांचा दंड ठोठावली आहे.

मराठवाड्यातील मराठी मुलाचा मराठी तडका..

लई भन्नाट
मुंबई - मराठी चित्रपटाला आता नव्या आशय,विषय आणि संकल्पनांसोबत नव्या धाडसाचीही सयाथ मिळत आहे।मराठी सिनेमातले होणारे नवनविन प्रयोग आता प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतांना दिसत आहे.औरंगाबादच्या अशाच एका पंचवीशीतल्या विशाल सदावर्ते याने या लहान वयात लई भन्नाट या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.फक्त निर्मितीच नव्हे तर या मराठी चित्रपटात त्याने नायकाचीही भूमिका यशस्वीरित्या पार पाडली आहे.मुंबई,पुणे,नाशिक,सातारा,सांगली नंतर आता मराठवाडयातील औरंगाबाद शहरातील या विशालने निर्माता आणि नायक अशा दोन्ही जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या आहेत.नुकताच या चित्रपटाच्या माध्यमाने त्याची मुंबईत भेट झाली तेव्हा तो चित्रपटाविषयी भरभरुन बोलला....
* विशाल,चित्रपटाचा निर्माता ते नायक पर्यतच्या आपल्या प्रवासाविषयी काही सांगशील ?
- चित्रपट व्यवसाय हा काही आमचा वडिलोपार्जित वयवसाय नाही। परंर्तु चित्रपट दिग्दर्शक बाबु भट हे माझया वडिलांचे (पंकज सदावर्ते ) जवळचे मित्र्र. दोघांच्या मनात चित्रपट तयार करण्याविषयी एकमत झाल्यावर वडिलांनी याची सर्व जबाबदारी माझ्या खांदयावर टाकून मोकळे झाले, आणि मी देखील जराही विचार नकरताच होकार दिला आणि लगेचच कामाला लागलो.
* चित्रपटात काम करण्याचे कसे ठरले?
- निर्माता मी स्वत:च असल्याने सर्व कामांवर माझी बारिक नजर होतीच. चित्रपटात नविन कलाकार नायक म्हणून घ्यायचे ठरल्यावर आमच्या सर्व टीमने माझेच नाव सुचवले.याबाबत वडिलांशी चर्चा केली, त्यांनी होकार दिल्यावरही मी विचार करण्यासाठी दोन दिवस घेतले.्र सर्व बाजुंनी विचार करुन मी अखेर चित्रपटात नायक साकारायला तयार झालो.
* अभिनयाचे काही प्रशिक्षण घेतलेस का
- नाही, अभिनाचे मी कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. अभिनयाबाबत इतकेच सांगु शकतो की, काही वर्षांपुर्वी मी गोविंदाचा नसीब हा चित्रपट पाहिला होता, आणि तेव्हा मनाशी ठरवलं होतं की चित्रपटात काम करणयाचा योग आला तर विनोदीच करणार.नशीबाने माझा हा पहिलाच चित्रपट विनोदी आहे.
* निर्माता आणि अभिनय दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितरित्या कशा पार पाडल्यास ?
- सुरवातीला थोडं अवघड वाटल्यासारखं झालं कारण, प्रॉडक्शनच्या सर्व कामात मी हवाच होतो आणि नायक म्हणूनही मी सेटवर हवा होतो।यासाठी नंतर काही दिवसांनी मी योजनेने काम केले.सर्वप्रथम मी माझे प्रसंग चित्रित करुन घेतले,नंतर माझ्याशिवाय असलेले प्रसंग चित्रित केले.
* चित्रपटाविषयी काही सांग....
- लई भन्नाट हा चित्रपट नावाप्रमाणेच लई भन्नाट विनोदी आहे।ही एक प्रेमकथा आहे ज्याला विनोदी सादरीकरणाची झालर आहे.चित्रपटात एकूण सात गाणी आहेत.या चित्रपटाचे 90 टक्के चित्रिकरण औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.चित्रटात माझी नायिका तेजस्विनी पंडित आहे.याशिवाय चित्रपटात अनंत जोग,विनय आपटे,राहुल सोलापूरकर,संजय सुगावकर यांच्या विशेष भूमिका आहे, आणि चित्रपटील एका फटकेबाज लावणीत महाराष्ट्‌ाची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर दिसणार आहे.चित्रपटाचा विषय लक्षात घेता हा चित्रपट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात औरंगाबाद,नाशिक,नगर,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि याठीकाणी स्वतंत्र प्रिंटसह प्रदर्शित करणार आहोत.
नृत्य आणि अभिनयाचा सुरेख संगम साधणारी यशस्वी अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांना नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। या निमित्ताने जयश्रीबाईंच्या यशस्वी कारकीर्दीचा घेतलेला आलेख -
1955 सालापासून आजवर अनेक मराठी चित्रपटातून चमकलेल्या जयश्री गडकर यांचा जन्म 1942 साली झाला। त्या कर्नाटकातील कारवारच्या आहेत. नृत्य आणि अभिनयाचा सुरेख संगम साधणाऱ्या जयश्री गडकर यांनी 1955 मध्ये चित्रपती व्ही. शांताराम यांच्या गाजलेल्या "झनक झनक पायल बाजे' या चित्रपटाच्या अभिनेत्री संध्या यांच्याबरोबर गु्रपडान्समध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांच्या नृत्याचे फोटो काढून राम देवताळे यांनी दिग्दर्शक दिनकर पाटील यांना दाखवले. दिनकर पाटील यांच्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात अभिनेते राजा गोसावी यांच्या समोर एक नृत्य करण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली. हाच त्यांचा पहिला मराठी चित्रपट. शांताराम बापूंच्या आशिर्वादाने ज्या अनेक कलावंतांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यातील एक जयश्रीबाई. पुढे त्यांनी एका पाठोपाठ एक सरस भूमिका करीत मराठी चंदेरी दुनियेत आपलं बस्तान मांडलं. "उतावळा नवरा पैशाचा पाऊस, "अवघाची संसार', "आलिया भोगासी' अशा चित्रपटातून त्यांनी राजा गोसावींची नायिका म्हणून काम केले त्यातील एक जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर यांच्या गाठ पडली ठका ठका या चित्रपटात एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका केली. यानंतर त्यांना तमाशाप्रधान चित्रपटाची नायिका म्हणून अमाप यश मिळाले.
1959 मधील अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या सांगत्ये ऐका या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात 132 आठवडे चालण्याचा विक्रम केला होता। "सांगत्ये ऐका' मधील "बुगडी माझी सांडली गं...' या लावणीने अनेकांना वेड लावले. जयश्री गडकर-राजा गोसावी ही जोडी गाजल्यानंतर अभिनेते सुर्यकांत यांच्या बरोबरही जयश्रीबाईंनी पंचारती, रंगपंचमी, वैजंयता, लाखात अशी देखणी अशा अनेक चित्रपटातून कामे केली. त्यांनतर त्यांची अरुण सरनाईकबरोबर चांगली जोडी जमली आणि त्यांचे सवाल माझा ऐका, गणगवळण, एक गाव बारा भानगडी हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. मानिनी या चित्रपटातील प्रमुख भूमिका जयश्रीबाईंनी यशस्वीरित्या साकार करून महिलावर्गामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटविला. सुभद्राहरण मध्ये त्यांनी विक्रम गोखलेची नायिका म्हणून काम केले. अशी ही नृत्यनिपुण अभिनेत्री मराठीतली महानायिका बनली. त्यामागे त्यांची खूप मेहनत आहे.
मराठीप्रमाणे हिंदीतही महान अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर जयश्रीबाईंनी काम केले आहे। प्रायव्हेट सेक्रेटरी, सारंगा, बजरंगबली, तुलसी विवाह हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट आहेत. नृत्यप्रधान, अवखळ, खट्याळ, नखरेल, सालस, सात्विक, सोज्वळ अशा विविध भूमिका जयश्रीबाईंनी समर्थपणे साकार केल्या आहेत. रामायण या मालिकेतही जयश्रीबाईंनी समर्थपणे बाळ धूरीबरोबर भूमिका केली आहे. 1975 मध्ये जयश्री गडकर यांचा बाळ धुरी यांच्याबरोबर विवाह झाला. सासर माहेर आणि अशी असावी सासू या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं. जयश्री गडकर यांना साधी माणसं, मानिनी, वैजयंता आणि पवनकाठचा धोंडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच व्ही. शांताराम पुरस्कार, गदिमा पुरस्कार, माणूस पुरस्कार, अल्फा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जयश्री गडकर यांना महाराष्ट्र शासनाने चित्रभूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांना खूप आनंद झाला आहे. मुंबई मित्र परिवारातर्फे जयश्री गडकर यांचे हार्दिक अभिनंदन.

लाचलुचपत विभागाला ७ शासकीय कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

मुंबई, दि. १७ : बेकायदेशीररित्या मालमत्ता गोळा करणाऱ्या ७ शासकीय कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडे बेकायदेशीररित्या अवैध मालमत्ता जमवलेली असल्यास ती जप्त करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने निर्देशिलेल्या ७ शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील इन्स्पेक्टर बबन कदम याचा समावेश आहे. कदम याने एमपीएससी परिक्षा भरती प्रक्रियेत घोटाळा करून अवैध मालमत्ता मिळवली होती. त्याची १.५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर अन्य सहा जणांमध्ये सोलापूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या बाळाराम रोकडे (२०.३९ लाख), आरोग्य विभाग सहाय्यक संचालक, औरंगाबाद डॉ. भगवान चव्हाण (४३.२३ लाख रुपये), अहमदनगर येथील आरटीओ मोटर इन्स्पेक्टर सय्यद अब्दुल रहिम (१८.२७ रुपये लाख), लातूर येथील रमेश मेडगे (११.४२), नंदुरबारचा कृषी अधिकारी बबन पाटील (४०.५० लाख रुपये) आणि जालनाचे कृषी पर्यवेक्षक केदारनाथ बुधवंत (३०.१० लाख रूपये) आदींचा समावेश असून या सर्वांची एकूण ३.१८ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील व्यापाऱ्याला ४ लाखाला लुटले

कल्याण,दि.१७ : पोलिसांची रेट झाल्याचे सांगून सोन्याचे बिस्किटे खरेदी करण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुण व्यापाऱ्यास ४,२५,००० रू. लुटल्याची घटना कल्याणात घडली. तरुणास लुटण्यासाठी ४ जणांसोबत ३ अनोळखी पोलीस असल्याचे तरुणाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील टिळकनगर रोड येथील शांतीजोग सोसायटी राहणारा २५ वर्षीय ललित मनोहर सोनी हा व्यापारी ४ एप्रिल रोजी कल्याणातील आधारवाडी चौक जवळचं सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यासाठी झाले होते. येथे व्यवहार होताना आरोपी अशोक नायडू, राजू पटेल, सचिन गावकर, सुभाष यांनी व्यापाऱ्यास बाजारभावापेक्षा १० टक्के कमी भावाने ४० तोळे वजनाचे ४ सोन्याची बिस्किटे देण्याची लालचं दिली. या लालचेला सोनी बळी पडले. आणि त्यांनी त्यांच्याजवळील ४,२५,००० रुपयांची रोकड बाहेर काढली. त्याचवेळी आरोपींनी बनावट नाट्य करून पोलिसांनी रेट टाळल्याचे सांगून व्यापाऱ्यास घाबरवून पळण्यास सांगितले. सोनी यांनी घाबरून त्यांच्याजवळील रोकडही बनावट पोलिसांच्या हवाली केली होती. सोनी व्यापाऱ्यास घडलेल्या प्रकाराचा काही दिवसांनी संशय आल्याने आपण लुटलो गेल्याचे समजले. व्यापारी सोनीयांनी सदर प्रकाराविषयी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अद्याप ७ आरोपींना अटक झाली असून पुढील तपास वपोनि सुदाम राखपसरे करित आहे.

४८ वर्षीय इसमावर प्राणघातल हल्ला

कल्याण, दि.१७ : मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय इसमा बेकायदेशीरपणे प्राणघातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळ ५७, ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील किराईच गांव येथे राहणारा सुरेंद्रसिंग जनकसिंग तोगार (४८) हा काल रात्रौ ८ च्या सुमारास कल्याण (प.) येथील एस.टी.स्टॅंड येथे फिरत होता. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याजवळील बॅग व अंगझडती घेतली. यात ५००० रु. कि. गावठी बनावटीचा कट्टा ४०,००० रु.कि.एक विदेशी पिस्टल १०,००० रु.कि.एक लोखंडी रिव्हॉल्व्हर, ४५० रु.कि. दोन जिवंत पितळी काडतूस, १४५० रु. रोख रक्कम, ६० रु. जूनी काळी छत्री व २०० रु. बॅग असा एकूण ५७,७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला.
महात्मा फुले पोलिसांनी सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५(१), प्रमाणे गुन्हा नोंदविला असून त्याला अटक केली आहे.

अबू सालेम खटला प्रकरणात सीबीआयचा हलगर्जीपणा?

मुंबई,दि.१७: पोर्तुगालहून अबू सालेम याच्या प्रत्यार्पणात सीबीआयनं हलगय केल्याचे पत्र आता हे प्रकरण अबू सालेम विरोधात खटला लढवणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या वकीलांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविले असून या पत्रामुळे सीबीआयनं हे प्रकरण खरोखरी दूरदृष्टीने हाताळले नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुलै ७ रोजी पार्वगीजच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी अबू सालेमला भारतात परत पाठविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून सीबीआयनं प्रत्यार्पणाची मागणी का केली याचा खुलासा करण्याची नोटीस दिली होती. प्रत्यार्पणच का हवे डिपोर्टेशन का नको? आता या नोटीसीनं खुलासा करण्यात सांगितले होते.
सरकारकडून प्रत्यार्पणासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांशी झालेल्या तडजोडीनंतर अबू सालेमविरोधात नोंदविण्यात आलेल्या २५ पैकी फक्त ८ प्रकरणात त्याच्यावर खटला चालविण्यास संमती देण्यात आली. तसेच अध्यक्षपदी झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार अबू सालेम याला दीर्घ कालावधीची शिक्षा तसेच फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असे ठरले. डिपोर्टेशनमध्ये अबू सालेमला दीर्घ मुदतीची वा फाशीची शिक्षा होऊ नये ही अट राहिली नसती असे दिल्ली पोलिसांचे वकील पत्रात म्हणतात.
यासंबंधात सीबीआयच्या मतानुसार, डिपोर्टेशनची एव्ह्यूडिशन हा मुद्दा ऍडिशनल ऑलिसीटर जनरल यांच्या कार्यकक्षेत येत नाही। मात्र ऍडिशनल ऑलिसीटर जनरल यांनी ५ मार्च रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून हे प्रकरण पोर्तुगालमध्ये धाउगर्दीने हालविले गेले असल्यानं पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून आपली चूक सुधारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते, असे समजते.
या प्रकरणात दिल्ली पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीसही अशाच प्रकारचा स्वतंत्र अर्ज पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकतात, असेही ऍडिशनल ऑलिसीटर जनरल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आणले होते, असे समजते.

माहिम दर्ग्याच्या प्रवेशद्वाराला स्थानिकांचा विरोध

मुंबई, दि. १८ : श्री सिद्धीविनायक देवस्थानच्या संरक्षक भिंतीवरून वाद सुरु असताना आता माहिम येथील जगप्रसिद्ध माहिम दर्ग्यात उभारण्यात आलेल्या संरक्षक प्रवेशद्वाराला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे.
माहिम येथे पीर मखदूम सहिबबाबाचा जगप्रसिद्ध दर्गा असून हा दर्गा माहिमचा दर्गा म्हणून ओळखला जातो. केवळ मुस्लिम धर्मियच नव्हे तर जगभरातून नानाविध धर्माचे अनेक भाविक येथे येतात. नुकतेच या दर्ग्याजवळ संरक्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पीर मखदूम साहिब स्वंयसेवी संस्थेने दर्ग्याच्या संरक्षणाचे कारण पुढे करून या ठिकाणी संरक्षक प्रवेशद्वार उभारले आहे. मात्र या प्रवेशद्वाराला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ आम्ही या दर्ग्यातूनच ये-जा करीत असताना अचानक प्रवेशद्वार उभारून आम्हाला प्रवेश नाकारण्यात येणे हे चुकीचे असल्याचा तक्रार दर्गा स्ट्रीट ऍडव्हान्स्ड लोकल मॅनेजमेंटचे अध्यक्ष अन्वर खान यांनी केली.
दर्ग्यातून जाणारा मार्ग हा आधीच अरुंद असून येण्यासाठी वा जाण्यासाठी प्रवेशद्वाराचा वापर केला जाऊ शकतो असे म्हणत प्रवेशद्वारामुळे चेंगराचेंगरीही होऊ शकते अशी भितीही खान यांनी व्यक्त केली.
तर याबाबत राज्य अल्पसंख्यांक समिती आणि पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना समजावले. मात्र दर्गा समितीने आम्ही दर्ग्याच्या आतील बाजूस प्रवेशद्वार उभारत असून त्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज वाटत नाही. तसेच प्रवेशद्वार उभारायचे की नाही हा सर्वस्वी आमचा प्रश्र्न आहे त्यामुळे कुणीही यात मध्यस्थी करू नये. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोय लक्षात घेऊनच आम्ही हे प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात केवळ दर्ग्याचे संरक्षण हाच मुद्दा नसून दर्ग्याची स्वच्छता हा विषयदेखील महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्य अल्पसंख्यांक समितीच्या सदस्यांनी सदर मुद्दयात समझौता करण्यासाठी नसीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याला भेट दिली.

'वेगळ्या विदर्भास राजीव गांधी तयार होते'

स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी वेगळा विदर्भ करण्यास तयारी दर्शविल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी केला आहे. त्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिले होते, परंतु केवळ कॉंग्रेस हितासाठी आपण त्यांना त्यापासून काही काळासाठी परावृत्त केल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले.
साठे सध्या नागपुरात असून, श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात त्यांनी ही माहिती दिली.
राजीव यांनी नियुक्त केलेल्या संगमा समितीने आपला अहवाल दिल्यानंतर त्यांनी आपल्याकडे वेगळा विदर्भ राज्य करण्‍याविषयीचे मत जाणून घेतले होते. तेव्हा आपण त्यांना विरोध केल्यानेच वेगळे विदर्भ राज्य न होऊ शकल्याचे साठे म्हणाले.
तत्कालीन राजकीय समीकरणे आणि कॉंग्रेसच्या हितामुळे आपण राजीव यांना यासाठी विरोध केल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले. निवडणुकांनंतरची समीकरणे पाहूनच आपण वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी असे त्यांना आपण सुचवले होते. मात्र, नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली आणि कॉंग्रेसची सत्ताही गेल्याने हा विषय मागे पडल्याचे ते म्हणाले.
सध्या अणू कराराबाबत नाहक वाद केला जात आहे. हा करार देश हितावह असल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी शिर्डीतील साईमंदिर रात्रभर खुले

शिर्डीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणा-या गुरूपौर्णिमेच्या उत्सवाला आज बुधवारपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणा-या या सोहळ्यात लाखो साईभक्त गुरूदर्शन घेतील. त्यासाठी शुक्रवारी साईमंदीर रात्रभर खुले ठेवण्यात येईल.
साईबाबा संस्थाननेही या उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. साईबाबा शिर्डीत वास्तव्य करत होते तेव्हापासून गुरूपौर्णिमेचा हा उत्सव साजरा करण्यात येतो. आज पहाटे झालेल्या काकड आरतीपासून या उत्सवाला सुरूवात झाली.
मुंबई-पुण्यासारख्या अनेक शहरातून आणि आसपासच्या गावातून साईभक्त पालख्या घेऊन शिर्डीत येतात. या साईभक्तांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था अपुरी पडणार नाही, याची संस्थानातर्फे काळजी घेण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी साईमंदिरावर नयनरम्य रोषणाई करण्यात आली असून तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.