बुधवार, 20 अगस्त 2008

स्पेनमध्ये विमान कोसळून ४५ ठार

माद्रिद, २० ऑगस्ट - माद्रिद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात "स्पेन एअर' च्या विमानात स्फोट होऊन विमानातील ४५ प्रवासी ठार झाले तर तितकेच जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातग्रस्त "स्पेनएअर ५०२२ हे विमान माद्रिद कडून कॅनरी बेटावर असलेल्या लास पामास्‌ कडे निघाले होते.
विमानातील प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मुख्य धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही अवधीतच विमानाच्या मागील बाजूला स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर जमिनीवर उतरविण्याच्या प्रयत्नात विमान कोसळले.
दरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतकार्यास सुरवात झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

कोल्हापूरात पोलिसांना महिलांकडून चोप

कोल्हापूर - मोरेवाडी येथील अवैध दारू हातभट्टयांवर कारवाईसाठी गेलेल्या राजारामपुरी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह सहा पो लिसांना महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली.
एका गर्भवती महिलेला कारवाईवेळी पोलिसांनी मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हा चोप दिला। हातभट्टीतील जळावू लाकूड, दगड आणि काठ्या यांचा वापर मारहाणीत करण्यात आला. तसेच पोलिस अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर काढून घेण्याचाही प्रयत्न महिलांनी केला.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांची सुटका केली.
मारहाण केलेल्या महिलांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कांजारभाट वस्तीवर छापा टाकून शोध मोहीम सुरू ठेवली होती.

भारताचे आणखी एक पदक निश्‍चित - बॉक्‍सिंगमध्ये विजयेंद्र कुमार उपांत्य फेरीत

बीजिंग, २० ऑगस्ट - भारतीय ऑलिम्पिकसाठी बुधवारचा दिवस दुहेरी आंनद घेवून आला आहे।
सुशील कुमारने वैयक्तिक पातळीवर कुस्तीत "ब्रॉन्झ'पदक मिळवून देवून नव्याने इतिहास लिहिला असताना, त्यापाठोपाठ विजयेंद्र यानेही बॉक्‍सिंगमध्ये अंतिम फेरी गाठून आणखी एक पदकाची निश्‍चिती केली आहे।
विजयेंद्र याने ७५ कि।ग्रॅ. च्या गटात ईक्‍युडोरच्या कार्लोस गोंगोरावर पहिल्यापासूनच वर्चस्व निर्माण करत ९-४ ने धूळ चारली.
त्यामुळे भारताचे आणखी एक पदक निश्‍चित झाले आहे.

मराठी अस्मितेविषयी आम्हाला कोणी शिकवू नये - राज ठाकरे

नांदेड, २० अगस्त - मराठी माणूस, मराठी भाषा हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे। त्यामुळे कृपाशंकरसिंह यांनी आम्हाला मराठी अस्मितेचा विषय शिकवू नये, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठवाड्यातील पक्षबांधणी, पक्षसंघटनेची पुनर्रचना करुन संघटना बळकट करण्यासाठी आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत, असेही त्यांनी सांगितले।
मुंबईत दुकाने, व्यापारी संस्थांवर मराठी भाषेचे फलक लावण्यासाठी मनसेची मोहिम सुरुच आहे; मुंबईच्या पालिका आयुक्‍तांनी तेथे दुकानांना नोटिसा देऊन मराठीत फलक लावण्याचे कळविले आहे, त्यामुळे त्यांच्या नोटीसीच्या मुदतीपर्यंत आम्ही वाट पाहू, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

साध्वीच्या ह्त्येप्रकरणी अरोपीचे चित्र प्रसिध्द !

मुंबई, २० ऑगस्ट, ऑगस्ट महिन्याच्या १० तारखेला पहाटे साडेचारच्या सुमारास कांदिवली येथील आनंदवन आश्रमातील एक ४५ वर्षीय महिला स्वामी चित्तकलानंद गिरी हिच्यावर चाकूच्या धारदार ह्त्याराने वार करून तिचा खून झाला होता. या प्रकरणाचा तपास करताच पोलिसांना त्याच आश्रमातील एक अन्य साधू फरार असल्याचे कलले. पोलिसांनी त्याच आश्रमातील पद्मनाभ याचा कसून तपास सुरू केला आहे .
कांदिवली पोलिसांनी त्या आरोपीचे चित्र जाहीर केले असून वय ६० ते ६५, ऊँची ५ फूट ७ इंच, रंग काला, मजबूत बांधा, केश काले-पांढरे, अंगावर भगवी वस्त्रे घालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा संशयित आरोपी इंग्रजी, हिन्दी व मल्यालम भाषा बोलतो व पायाने अधू असल्याने लंगडत चालतो, असे सांगितले. त्याचप्रमाणे पोलिसांनी आरोपीचे केश, दाढी असलेले व नसलेले असे दोन्ही फोटो जाहीर केले असून संबंधित व्यक्तीबाबत कुणालाही माहिती असल्यास त्यानी त्वरित कांदिवली पोलिस ठाण्यात ह्या दूरध्वनी क्रमांक २८०५०९०४ वर संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे । या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेन्द्रकुमार जायसवाल आणि पोलिस निरीक्षक सुभाष वेले करीत आहेत !

लातूरची ओळख हरित जिल्हा व्हावी

लातूर, २० अगस्ट-राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरात, गावात, आणि शेतात वृक्षारोपण करावे तसेच जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करुन लातूर जिल्ह्याची ओळख हरित जिल्हा म्हणून निर्माण करण्यासाठी नियोजनबध्द रीतीने सामाजिक वनीकरण विभागाने काम करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्रदिनी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते। या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सी. एम. धारणकर यांनी जिल्ह्यातील वनीकरणाची माहिती देताना सांगितले की, लातूर जिल्ह्यात ७ हजार ३८० झाडे गायरान जमिनीवर, तर २ हजार १३५ झाडे खासगी जमिनीवर, आणि ५८० किलोमीटर रस्त्यावर झाडे लावण्यात आलेली आहेत. २००८ या वर्षात आणखी ३७५ हेक्टर जमीनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात साडेबारा लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागातफेर् दहा लाख रोपं लावण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात सध्या ४५ जातींची पाच लाख झाडे उपलब्ध आहेत.
यावेळी नगराध्यक्ष अॅड. व्यंकट बेदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. त्रिंबकदास झंवर, जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

निरीक्षकासह पोलिसांच्या कोठडीत वाढ

नाशिक, २० अगस्ट-हिरे-सोने चोरीचा परस्पर तपास करून हाती आलेला ऐवज स्वत:च हडप केल्याचा आरोप असलेल्या अंबड पोलिस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या पाच कर्मचाऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळून त्यांच्या या प्रयत्नांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बुधवंत यांच्यासह पोलिस शिपाई राजेंद नगरकर, बाळू वाघ, कैलास थेटे व विठ्ठल माळी यांच्याविरुध्द जुलैच्या पहिल्या आठवड्यात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन महिन्यांपूवीर् कुरिअरच्या माध्यमातून शहरातील एका सराफाने हिरे, कच्चे सोने व सोन्याचे दागिने असा सुमारे २५ लाखांचा ऐवज मागविला होता। कुरिअर घेऊन येणारा ट्रक जकात भरण्यासाठी विल्होळी नाक्यावर थांबल्यावर हिरे व सोन्याचे पाकिट ट्रकमधून चोरीस गेले होते. या प्रकरणी तक्रार नोंदवून न घेता अंबड पोलिसांनी परस्पर तपास केला होता.
तपासादरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेतले व खासगी गाडीतून संगमनेर गाठून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. पुढील कायदेशीर प्रक्रियेला फाटा देत त्यातील निम्मा ऐवज स्वत:च हडप केला होता. त्यानंतर २८ मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केवळ १० लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे नोंदविण्यात आल्याचा आरोप या पाचही संशयितांवर ठेवण्यात आला आहे.