रविवार, 28 सितंबर 2008

बांगलादेशी घुसखोरांना अटकाव घाला: अडवाणी

गुवाहाटी, २८ सप्टेंबर-राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करण्यासाठी पाकच्या आयएसआयवर हल्ला चढवताना भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणार्‍या घुसखोरांना अटकाव घालण्याची गरज व्यक्त केली.
ईशान्येत आयएसआयच्या पुढाकाराने घुसखोरी होते. ईशान्येतील लोकांना त्रस्त करणार्‍या घुसखोरीबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सतर्क होते. दिल्लीत शनिवारी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातील स्फोटके हे बांगलादेशातून आणण्यात आले होते.
देशात याअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटातील स्फोटके आणि दिल्ली स्फोटातील स्फोटकांमध्ये फरक होता। हे बॉम्ब बांगलादेशातून पाठवण्यात आले होते.
घुसखोरी ही फक्त आसामच्या अस्तित्वास धोका नसून देशाच्या सुरक्षेसही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आसाममधील मुस्लिमांना त्यांनी सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले.

कोई टिप्पणी नहीं: