जोधपूर, ३० सप्टेंबर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चामुंडादेवी चेंगराचेंगरी कांडानंतर चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
जखमींनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत देण्यात येईल. राजे यांनी मेहरनगढ भागातील घटनास्थळी भेट दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्यास चौकशी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें