सोमवार, 15 सितंबर 2008

दहशतवाद्यांचे पुढचे टार्गेट मुंबई?

मुंबई, १५ सप्टेम्बर- मुंबई जयपुर , अहमदाबाद, बंगळुरू आणि नवी दिल्लीनंतर दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणा-या इंडियन मुजाहिदीनने आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लक्ष्य करण्यीच धमकी दिली आहे.
चार महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आता पर्यंत सुमारे १३० लोकांनी प्राण गमावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मुंबई पोलिसच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) मुस्लिमांना विनाकारण त्रास दिला आहे. त्यामुळे हे हल्ले करण्यात आल्याचे इंडियन मुजाहिदीन केलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुस्लिमांवर होणा-या या अत्याचारावर इंडियन मुजाहिदीनची करडी नजर असल्याचंही या नमूद केलं आहे.
या दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या इमेलमध्ये लिहिले आहे की, तुम्हांला माहिती पाहिजे की तुम्ही जे काही करतायं ते आम्हांला माहित आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. योग्य वेळीची आम्ही वाट पाहत आहोत. अंसारनगर आणि अंधेरीतील मोगरापाडा भागात मध्यरात्री मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जाणून बूजून मुस्लिमांवर कारवाई करण्यात आली.
चौकशी करताना मुस्लिम महिला आणि मुलांशी ज्या प्रकारे वागणूक दिली जाते. त्याची किंमत मुंबईतील लोकांना आपले प्राण गमावून द्यावी लागणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुंबईच्या एटीएस विभागाला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील आहे, असेही या मेलमध्ये लिहिलेलं आहे. राजस्थानचे उपपोलिस महानिरीक्षक ए. के. जैन यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
ईमेलमध्ये गुरुअलहिंदी आणि अल-अरबी या दोन नावांनी सह्या केल्या आहे.

कोई टिप्पणी नहीं: