गुरुवार, 26 जून 2008

मुंबईत पोलिस चकमकीत दोन गुंड ठार, पोलिस निरीक्षक जखमी

मुंबई - कांदिवली-चारकोप भागात आज झालेल्या पोलिस चकमकीत कुख्यात रवी पुजारी टोळीचे दोन गुंड ठार झाले। या चकमकीत एक पोलिस निरीक्षकही जखमी झाले.
उपलब्ध माहितीनुसार आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पुजारी टोळीचा सुनील बंगेरा उर्फ़ पुथरन हा गुंड आपल्या एका साथीदारासह चारकोप परिसरात येणार असल्याची खबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेस मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी तेथे सापळा रचला. त्या ठिकाणी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हे दोघेही गुंड मारले गेले. या वेळी पायास गोळी लागून पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे हे जखमी झाले. त्यांना भगवती रुग्णालयात घेवून गेले असता त्यांनी अलकनुरे यांना नानावटी हास्पिटल मध्ये घेवून जाण्यास सांगितले. तेथे त्यांच्यावर उपचार शुरू आहेत।

दहावीचा निकाल घोषित

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २००८ मध्ये घेतलेल्या शालांत परीक्षेत कोल्हापूर विभागातील साताऱ्याचा गौरव कुलकर्णी हा राज्यात पहिला आला. त्याला ९७.८४ टक्के गुण मिळाले आहेत. गौरव हा साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. विभागनिहाय पहिले आलेले विद्यार्थी आणि त्यांची टक्केवारी गौरव कुलकर्णी - ९७.८४ टक्के (कोल्हापूर) पूजा सुनीलराव वानखेडे - ९७.२३ टक्के (अमरावती) सायली रुपसिंग सागर - ९७.२३ टक्के (लातूर) सुरभी सुरजलाल गणवीर - ९७.०७ टक्के (नागपूर) स्नेहा गोविंदप्रसाद डालिया - ९६.७६ टक्के (औरंगाबाद) प्रतीक मोहन रामदासी - ९६.६१ टक्के (मुंबई, विभागून) मधुरा सुधीर नाईक - ९६.६१ टक्के (मुंबई, विभागून) बिल्वा दीपक उपाध्ये - ९६.०० टक्के (पुणे) कल्याणी कृष्णा सुर्यवंशी - ९५.२३ टक्के (नाशिक) यंदाच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये- उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त. औरंगाबादचा निकाल राज्यात सर्वाधिक. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ७० हजार विद्यार्थी जास्त बसले होते. पन्नास टक्केपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळांची संख्या पाचशे इतकी.