मुंबई, १९ अगस्ट-बोरिवलीतले प्रसिद्ध ज्वेलर श्रीनिवास आचार्य यांच्यावर आज सकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवानं, घाईगडबडीत त्यांचा नेम चुकला आणि आचार्य बचावले. हे हल्लेखोर हेमंत पुजारी टोळीचे असण्याची शक्यता आहे.
श्रीनिवास आचार्य आज सकाळी घरून आपल्या दुकानात जायला निघाले होते। ते त्यांच्या गाडीजवळ पोहोचले, तेव्हाच दोन जण समोर उभे ठाकले आणि त्यांनी दोन गोळ्या झाडल्या. पण त्या आचार्य यांच्या ब-याच लांबून गेल्या. त्या आवाजानं आजूबाजूची बरीच माणसं गोळा झाली. दोघांना पकडण्याचा त्यांनी प्रयत्नही केला, पण एक गोळी हवेत झाडून त्यांनी सगळ्यांना बाजूला सारलं आणि रिक्षातून पसार झाले.
हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशानं झालं, श्रीनिवास आचार्य यांना लुटण्याचा हा प्रयत्न होता की धमकावण्याचा हे अद्याप कळू शकलेलं नाही. परंतु, हेमंत पुजारी गँगनं हा हल्ला केला असावा, अशी शक्यता आहे.