मंगलवार, 2 सितंबर 2008

सेंसेक्स में उछाल सूचकांक १५ हजार के पार

मुंबई, २ सितंबर- कच्चे तेल के पिघलने के साथ ही बैंकिंग, रियलटी, ऑइल एंड गैस और इंजीनियरिंग क्षेत्र की कंपनियों के शेयरों में निवेशकों के जोरदार समर्थन के बीच देश के शेयर बाजारों ने आज लंबी छलाँग लगाई।
बम्बई शेयर बाजार (बीएसई) का सेंसेक्स ५५३ अंक उछलकर २० दिन के अंतराल के बाद फिर 15 हजार अंक से ऊपर निकल गया। नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) का निफ्टी १५५ अंक की दौड़ से ४५०० अंक से ऊपर बंद हुआ। एशियाई शेयर बाजारों में गिरावट के बावजूद यहाँ शुरू से ही मजबूती का रुख रहा।
गुस्ताव तूफान की रफ्तार धीमी पड़ जाने से नुकसान कम होने की उम्मीद के चलते कच्चा तेल आज चार माह के निम्नस्तर १०५.४६ डॉलर प्रति बैरल तक लुढ़क गया। विश्लेषक उम्मीद कर रहे हैं कि अमेरि‍का और चीन जैसी विश्व की बड़ी अर्थव्यवस्थाओं में ईंधन की माँग कम होने से कच्चे तेल के दाम और गिर सकते हैं।
बाजार सूत्रों के मुताबिक विदेशी संस्थान फिर से सक्रिय होते नजर आ रहे हैं। इसे देखते हुए पिछले तीन कारोबारी दिवसों में यह दूसरा मौका है कि सेंसेक्स ने ५०० अंक से अधिक की छलाँग लगाई है। शुक्रवार को भी सेंसेक्स ५१६ अंक बढ़ा था।
सेंसेक्स कल के १४४९८.५१ अंक की तुलना में १४६०९.४४ अंक पर खुला और नीचे में १४५४३.२१ अंक तक गिरने के बाद लिवाली की लहर में इसकी तुलना में ५६३ अंक बढ़कर ऊपर में १५१०६.१५ अंक तक जाने के बाद समाप्ति पर कुल ५५२.९४ अंक अर्थात ३.८१ प्रतिशत की छलाँग के साथ १५०५१.४५ अंक पर बंद हुआ।
तेरह अगस्त के १५०९३ अंक के बाद सेंसेक्स फिर १५००० अंक से ऊपर निकला। एनएसई का निफ्टी १५५.३५ अंक अर्थात ३.५७ प्रतिशत की बढ़त से ४५०४ अंक पर पहुँच गया। बीएसई के अन्य सूचकांकों में मिडकैप और स्मालकैप में क्रमश: ९१.५९ तथा ८९.०८ अंक की बढ़त रही। यह सूचकांक समाप्ति पर क्रमश: १.६० तथा १.२९ प्रतिशत बढ़त से ५८३३.५७ और ६९८०.४७ अंक पर बंद हुए।
ब्याज दरों में फिलहाल और बढ़ोतरी की संभावनाएँ कम होने से बीएसई के बैंकेक्स ने ४२०.५८ अंक की छलाँग लगाई। कैपीटल गुड्स का शेयर ४४२.०६ अंक और रियलटी ३५१.३६ अंक ऊपर रहा। ऑइल एंड गैस ३५१.५२ अंक, मैटल १६४.०५ अंक तथा आईटी ११०.१७ अंक ऊँचा बंद हुआ। निफ्टी मिडकैप में १.९५ प्रतिशत निफ्टी जूनियर में ३.६८ प्रतिशत का उछाल आया।

ज्येष्ठ वकील विनायकराव वालावलकर यांचे कोर्टातच निधन

मुंबई, २ सप्टेम्बर- हायकोर्टातील ज्येष्ठ वकील विनायकराव वालावलकर (८८) यांचे सोमवारी दुपारी हायकोर्टात युक्तिवाद करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
न्या. आर. एम. सावंत यांच्या कोर्टात ते एका प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी आले होते. दुपारी भर कोर्टातच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या निधनाने कोर्टाचे कामकाज दोन तासांसाठी तहकूब करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन कन्या आहेत. त्यांचा मुलगा नरेंद वालावलकर हेसुद्ध ज्येष्ठ वकील आहेत. त्यांच्यावर दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वालावलकर हे शहर दिवाणी कोर्टात काही काळ न्यायाधीशही होते. आणीबाणीच्या काळात १९७५ मध्ये त्यांना तुरुंगवासही झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी विविध महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये काम पाहिले होते. ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे काही काळ सदस्यही होते.

"टॅप' केलेले संभाषणही "मोका'नुसार पुरावाच- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, २ सप्टेम्बर- दोन व्यक्तींमधील कोणतेही "टॅप' केलेले संभाषण हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोका) पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल, असा नवा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणे आता पोलिसांना अधिक सोपे होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सन २००३ मध्ये संभाषण हा पुरावा ठरू शकत नसल्याचा निकाल दिला होता। त्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निकाल रद्द केला. संशयित आरोपींचे संभाषण "टॅप' करणे आणि ते पुरावा म्हणून वापरणे, या दोन्ही गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.
"मोका' लावण्यात आलेले आरोपी आणि चित्रपटसृष्टीतील अर्थपुरवठादार भरत शहा, छोटा शकीलचा संशयित साथीदार शमीम मिर्झा अरिफ बेग, जमिनी बळकावणारा संजय पाटील यांच्यासह काही जणांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले होते. गुन्हेगारी टोळ्यांतील आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यासाठी या कायद्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे म्हणणे महाराष्ट्र सरकारने मांडले होते.
गुजरातमध्येही संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कडक कायद्याची मागणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने त्यांना बळच मिळाले आहे.

अतिकुपोषित मुलांसाठी राज्यात बालविकास केंद्रांची स्थापना

चंदगड, २ सप्टेम्बर - सहा वर्षांखालील अतिकुपोषित बालकांना एकत्रित आरोग्य व आहार सेवा देऊन कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी औरंगाबादच्या राजमाता जिजाऊ माता, बालआरोग्य व पोषण केंद्राच्या साह्याने शासनाने बालविकास केंद्राची स्थापना करण्याचे निश्‍चित केले आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यासाठी एक केंद्र स्थापन करण्याचे निर्देश आहेत.
बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासनाने आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत, तरीही काही ठिकाणी कुपोषित मुले आढळत असल्याने तज्ज्ञांच्या मतानुसार ही नवी योजना आखली आहे. नियमित आहार घेऊनही वजन वाढत नसलेल्या बालकांना केंद्रात दाखल करून शास्त्रीय नियमानुसार आहार दिला जाणार आहे.
केंद्रासाठी स्वतंत्र सर्वसोयींनी सुसज्ज इमारत, औषधपुरवठा, त्यासाठीचा निधी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा राबविली जाणार आहे.
किमान पंधरा ते एकवीस दिवसांचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी संबंधित मुलाचे पालक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांनी केंद्रात थांबावयाचे आहे. सात महिने ते तीन वर्षांपर्यंत शिशुगट व तीन ते सहा वर्षांसाठी बालगट करून दररोजच्या वेळापत्रकानुसार गाईचे दूध, साखर, तेल, पाणी, भाजी, उकडलेला बटाटा, दही, अंडी ठराविक प्रमाणात देऊन रोजच्या वजनाची नोंद ठेवली जाणार आहे. बालक घरी जाताना त्याची सर्व माहिती एका कार्डावर देऊन नंतरच्या काळातही ते पुन्हा कुपोषणात जाऊ नये म्हणून अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग सतर्क राहणार आहे.
कुपोषणमुक्त समाजासाठी मातेचा आणि संपूर्ण समाजाचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून, स्थानिक पातळीवर मुलांचे उंचीच्या प्रमाणात वजन निश्‍चित करून सुदृढ, कुपोषित, अतिकुपोषित यादी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांमार्फत केले जात आहे. त्यासाठी शासनाने शास्त्रीय निकष वापरले असून, या तक्‍त्यांचा पुरवठा सेविकेंना केला आहे. या नव्या माहितीनुसार मुलांची श्रेणी निश्‍चित करून कुपोषित मुलांसाठी ही नवी योजना राबविली जाणार आहे.

अमेरिकेत वादळाने हाहाकार

अमेरिका, २ सप्टेम्बर-अमेरिकेच्या लुइझाना प्रांत परिसरात आगामी काही तासात 'गुस्ताव' या समुद्री वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवल्यानंतर या भागात हाहाकार माजला असून, या भागातील लाखो नागरिकांनी सुरक्षीतस्थळी प्रयाण केले आहे.
अमेरिकेत गेल्यावर्षी आलेल्या कॅटरिना या वादळापेक्षा गुस्तावची ताकद अधिक असल्याने बुश प्रशासनानेही नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ताशी १८० किलोमीटर वेगाने हे वारे वाहतात, यानंतर या भागाला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
अनेक भारतीयांनीही याचा धसका घेतला असून, या भागात अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. इतकेच नाही तर या प्रांताचे गव्हर्नरही भारतीय बॉबी जिंदाल हेच असल्याने येथील भारतीयांनाही सुरक्षीतस्थळी हालवण्यात येत आहे.