मुंबई, १२ सप्टेम्बर- ' मुंबई ही आमच्याच बापाची असून ती तुमच्यासारख्या घटनेच्या आधारे आक्रमण करणाऱ्या परप्रांतियांची तर मुळीच नाही. त्यामुळे कृपया आपल्या वदीर्ची गुर्मी घेवून लवकरच महाराष्ट्रातून दिल्लीसारख्या मुक्कामी जावे', अशी टीका शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांना केली आहे,
' मुंबई कुणाच्या बापाच्या नाही,' अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या के. एल. प्रसाद यांना रावते यांनी पत्र पाठवले असून त्यात ही सूचना केली आहे. आपण पोलिस खात्यात असूनही गावगुंड वापरतात तसली भाषा वापरून मुंबईकरांचा घोर अपमान केल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
' एखाद्याचा बाप काढणे हे महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. पोलिसांच्या पदाची आणि वदीर्ची माहिती सर्वांनाच आहे. मात्र या पदावर असताना मुंबईकरांचा बाप काढणे, हे एवढे तुम्हाला सोपे वाटते का? यालाच अधिकाराचा अहंकार व वदीर्ची मस्ती म्हणतात', असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें