सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठावरही राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी आज हल्ला चढविला. परप्रांतीयांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्कत्यांनी सलग चौथ्या दिवशी , मंगळवारी सातारा रोडवरील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजवर , तसेच आयटी आणि बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटवर दगडफेक केली. यामध्ये मेडिकल कॉलेजची एक मुलगी जखमी झाली आहे.
गेले तीन दिवस मनसे कार्यर्कत्यांनी विविध शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा , तसेच मंगळवारी सकाळीही पोलिसांनी सुमारे २०० कार्यर्कत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह ७-८ कार्यकतेर् मोटारसायकलवरून भारती विद्यापीठाच्या आवारात पोचले. त्यांनी बाहेरूनच इमारतीच्या काचांवर दगडफेक केली आणि लागलीच तेथून पोबारा केला. जाताना आयटी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या इमारतीवरही त्यांनी दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप अटक झाली नसून तपास सुरू आहे.
दरम्यान , मेडिकल कॉलेजच्या पायऱ्यांवर बसलेली एक विद्याथिर्नी काच लागल्याने जखमी झाली असून तिला भारती हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आले आहे.
सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सात-आठ भुरटे लोक आले आणि काचांवर दगड मारून पळून गेले. हा हल्ला कसला, निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. कदम यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच आधी प्रवेश परीक्षा होते. त्या परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यापूर्वीच हा स्टंट करण्यात आला, असे ते म्हणाले.