गुरुवार, 31 जुलाई 2008

मायावती पंतप्रधानपदाच्‍या उमेदवार नाही-माकपा

नवी दिल्ली, ३१ जुलै- बसपा अध्यक्षा मायावती पंतप्रधान पदाच्‍या उमेदवार नाहीत, अशी घोषणा भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाने केली आहे. मायावतींना पंतप्रधान म्‍हणून प्रोजेक्‍ट केले जाण्‍याच्‍या तिस-या आघाडीच्‍या प्रयत्‍नांपासून आपला संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत भाकपने आपण कुणाही व्‍यक्‍तीला असे प्रोजेक्‍ट करू इच्छित नसल्‍याचे म्‍हटले आहे.
पक्षाचे महासचिव प्रकाश करात म्‍हणाले, की मला खात्री आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी आपल्‍या बळकटावस्‍थेत उभी राहू शकेल.
कॉंग्रेस किंवा भाजप या पक्षांव्‍यतिरिक्‍त राजकारण उभारता येईल अशा तिस-या आघाडीच्‍या निर्मितीचा प्रयत्‍न डावे पक्ष करीत आहेत.
तिसरी आघाडी केवळ निवडणुकांपूरती मर्यादीत नसावी तर या आघाडीचा खास कार्यक्रमही असावा असे आपल्‍या पक्षाचे म्‍हणणे असल्‍याचेही करात यांनी सांगितले.

भाजपचे संघटनात्मक फेरबदलांचे संकेत

नवी दिल्ली, ३१ जुलै- आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षात संघटनात्मकस्‍तरावर व्यापक फेरबदलांचे संकेत पक्षाच्‍या सुत्रांनी दिले आहेत. त्‍यादृष्‍टीने पक्षाने तयारी सुरू केली असून लोकसभा निवडणुकीच्‍या उमेदवारांची यादी जाहीर करण्‍याचे काम तुर्तास स्‍थगित ठेवले आहे.
सर्वच राज्‍यात पक्षाचे प्रमुख बदलले जाण्‍याचे संकेत पक्षाच्‍या सुत्रांनी दिले आहेत। या प्रक्रियेत पक्ष आपले पूर्वीचे निर्णय बदलण्‍याची शक्‍यता आहे. पक्षाच्‍या एका वरिष्ठ नेत्‍याने सांगितले, की आगामी निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्‍याच्‍या उदेदशाने पक्षाने तयारी सुरू केली असून सर्व राज्यांतील आपल्‍या प्रमुखांना व राज्यसभेतील वरिष्ठ नेत्‍यांना निवडणूक लढविण्‍याची संधी देण्‍याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत सर्व राज्‍यातील प्रमुख नेत्‍यांना दोन्‍ही जबाबदा-या सांभळाव्‍या लागण्‍याची शक्‍यता आहे.
पक्षाचे माजी अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी यापूर्वीग्‍च आपण निवडणुका लढविणार नसल्‍याचे जाहीर केले असून त्‍यांच्‍याकडे निवडणुकांची प्रमुख पदाची जबाबदारी असणार आहे.

'जिगर'ने वाटले झोपडपट्टीमध्ये सीएफएल

पुणे, ३१ जुलै- लोडशेडिंगमुळे पुणेकर हैराण झाले असताना झोपडपट्टीवासीयांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कॉमनवेल्थ युथ स्पधेर्अंतर्गत 'पर्यावरण मित्र' ही मोहीम राबवण्यात येणार असून त्याद्वारे सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्पधेर्चा मस्कॉट 'जिगर'च्या हस्ते सीएफएलचे दिवे आणि रोपांचे वाटप केले जाणार आहे.
कवेर्नगरमधील मावळे आळी झोपडपट्टीपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। 'जिगर'च्या हस्ते या भागातील घरे आणि दुकानांमध्ये सीएफएल दिवे लावण्यात आले. यावेळी स्पधेर्चे सल्लागार आदित्यन कुमार, 'प्रयास'चे शंतनू दीक्षित, 'डब्ल्यूएनएस'च्या बबिता प्रकाश, 'पर्यावरण मित्र'चे समन्वयक शंकर कलमानी, नरेंद चव्हाण आणि भगवान कडू उपस्थित होते. ब्रिटीश गॅस आणि डब्ल्यूएनएस यांच्या सहकार्याने ही मोहीम शहरात राबवण्यात येणार असून पुणे विद्यापीठ आणि सारथी यांनीही मदत केली आहे.
या मोहिमेसाठी अकराशे स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक झोपडपट्टीतून २५ कार्यकत्यांची निवड केली जाईल. शहरात सुमारे ५०० झोपडपट्ट्या असून प्रत्येक ठिकाणी सुमारे २०० दिवे मोफत वाटले जाणार असल्याचे कलमानी यांनी सांगितले.

"पोटा' कायद्याचे अडवानींकडून पुन्हा समर्थन

अहमदाबाद, ३१ जुलाई- केंद्र सरकारने दहशतवादाविषयीच्या आपल्या भूमिकेत बदल करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत भाजपचे व रिष्ठ नेता लालकृष्ण अडवानी यांनी रविवारी येथे केले. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांनी आज बॉम्बस्फोट ठिकाणांना भेट दिली तसेच रूग्णालयात जावून स्फोटातील जखमींची विचारपूस केली.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतानाना त्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी "पोटा' कायदा लागू करण्यावर जोर दिला.
त्याचबरोबर दहशतवाद निपटून काढण्यासंबंधीच्या गुजरात सरकारच्या कायद्यास तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली. हे विधेयक चार वर्षापूर्वी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले आहे, मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे अडवाणींनी स्पष्ट केले.

राणेंचा 'प्रहार' ऑक्टोबरमध्ये येणार

मुंबई, ३१ जुलाई- हा 'प्रहार' सूडाचा नसेल, प्रबोधनाचा असेल. सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असून आपल्यातील मंत्री व पत्रकार एकमेकांना निश्चितच छेद देणार नाहीत, अशी ग्वाही महसूलमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी मुंबईत दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर (नऊ ऑक्टोबर) राणे संपादकाच्या भूमिकेत शिरत असून त्यांच्या 'प्रहार' या दैनिकाची घोषणा मुंबईत झाली.
आपल्याला लहानपणापासून वाचनाचा छंद होता, असे सांगून राणे म्हणाले की, आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत, त्याचे श्रेय या वाचनाला व वृत्तपत्रांनाच जाते. आपण जरी सरकारचा भाग असलो तरी, वस्तुस्थिती कायम मान्य करतो. दैनिकातही आपण वस्तुनिष्ठ भूमिकाच मांडू, असेही त्यांनी सांगितले. या दैनिकात केवळ राजकारण नसेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावरही ते भर देईल, असे राणे म्हणाले. आपण या वृत्तपत्रात अग्रलेखही लिहिणार असल्याचे सूतोवाच करताना राणे यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्ानंना मनमोकळी उत्तरे दिली. राणे या दैनिकाचे मुख्य संपादक; तर आल्हाद गोडबोले संपादक असणार आहेत.