गुरुवार, 21 अगस्त 2008

समाजाला अधिकाधिक स्वस्त वैद्यकिय केंद्राची गरज-गोपिनाथ मुंडे

मुंबई, २१ ऑगस्ट- राजकारण करत असताना त्याला समाजकरणाची भक्कम जोड़ दिली पाहिजे तरच ते ख-या अर्थाने राजकारण असते व हे विचार आपल्या कृतीतून अमलात आणणारे जयप्रकाश ठाकुर व विनस कल्चरल असोसिएशन यांचे याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो असे उदगार भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांनी काढले ।
विनस कल्चरल असोसिएशन या संस्थेतर्फे चारकोप विधानसभा मतदार संघातील वैद्यकिय सेवा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते; या वैद्यकिय सेवा केंद्रात तज्ञ डॉक्टर तसेच अत्याधुनीक सोयी सुविधा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या असून त्यामुले गोरगरिबांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. या केंद्राच्या उद्घघाटनाला पूर्व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक, मुंबई भाजपा अध्यक्ष गोपाल शेट्टी, भाजपा जिलाध्यक्ष योगेश सागर, महाराष्ट्र उपाध्यक्ष भाई गिरकर, यांच्या सह अनेक प्रतिष्ठित डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.
येणा-या दिवसांमधे वैद्यकिय सोयी-सुविधा अधिक खर्चीक होत जाणार असल्याचे सांगून त्यामुले अशी वैद्यकिय सुविधा केन्द्र अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू केली गेली पाहिजेत असे आव्हानही या प्रसंगी बोलताना गोपीनाथ मुंडे यांनी केले । या प्रसंगी अनेक मान्यवरांनी काही लाखापर्यंतच्या देणग्याही या संस्थेकरीता जहीर केल्या.

विलासरावांचा आता राणेंवर 'प्रहार'

मुंबई, 21 ऑगस्ट- विलासरावांनी व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला दिलेल्या जमिनीचा व्यवहार अनधिकृत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्याविरोधात बंडाचे निशाण फडकवणाऱ्या नारायण राणेंवर आता विलासरावांनीच प्रहार केला असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही विरोध न होता या व्यवहारावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याने आता राणे या प्रकरणी एकटे पडले आहेत.
या उलट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता वरिष्ठांनाही विलासरावांची या प्रकरणी घेतलेली भूमिका योग्य वाटत आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला जाणार असल्याने आणि राणे या मुद्द्यावरून नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राणेंनी या बैठकीला अनुपस्थिती लावत आपण अजूनही नाराज असल्याचे स्पष्ट केले. आणि आपण आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
परंतु राणेंनी या बैठकीला अनुपस्थिती लावल्याने हा मुद्द्यावर अधिक विरोध होण्या आधीच या व्यवहाराला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला.

पीपीपीकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी झरदारींची उमेदवारी?

इस्लामाबाद, २१ ऑगस्ट-पाकिस्तानातील सत्ताधारी आघाडीत मतभेद गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या वरिष्ठ नेत्यात झालेल्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षाचे सहायक अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचे नामांकण जाहीर करण्याची शक्यता आहे.
झरदारींनी काल आयोजित केलेल्या रात्रीभोजनात पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या उमेदवारीस समर्थन व्यक्त करून 'सर्वात योग्य उमेदवार' म्हणून निर्वाळा दिला. आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष मुताहिदा क्वामी मुव्हमेंटनेही झरदारींनास राष्ट्राध्यक्ष बनवण्याचे समर्थन केल्यानंतर याबाबत घडामोडीस सुरूवात झाली आहे.
एवढ्यातल्या मुलाखतीत झरदारींनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे खंडन केले होते, मात्र सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नात्याने पदावर अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.
सत्ताधारी आघाडीतील नेत्यांसोबत चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेणार असे त्यांनी पक्ष खासदारांना सांगितले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांना परत सेवेत न घेतल्यास सरकारमधून बाहेर पडून विरोधात बसण्याची धमकी पीएमएल-एन पक्षाच्या नवाझ शरीफ यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर पीपीपीने झरदारी यांना प्रोजेक्ट केले आहे.

बहुप्रतिक्षीत "आयफोन' गुरूवारी मध्यरात्री पासून भारतीय बाजारात

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट - असंख्य मोबाईल प्रेमींची शिगेला पोहोचलेली प्रतिक्षा आता संपलीअसून बहुप्रतिक्षीत "आयफोन' भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आज (गुरूवारपासून) मध्यरात्रीपासून दाखल होत आहे.
एअरटेल आणि वोडाफोन या दोन मोबाईल कंपन्या "३-जी' सुविधायुक्त "आयफोन' भारतीय बाजारात आणत आहेत.
यातील "८-जीबी' मॉडेलची किंमत ३१ हजार रूपये तर "१६-जीबी' मॉडेलची किंमत ३६ हजार ठेवण्यात आल्याचे कळते. मात्र ही किंमत अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे जाणकारांच्या मत आहे.
काही महिन्यांपुर्वी "आयफोन' हा इंटरेनट सुविधेने युक्‍त मल्टिमिडीया स्मार्टफोन ऍपल कंपनीने बाजारात आणून जगभर खळबळ उडवून दिली आहे.
ब्रिटन आणि जर्मनीत तर खरेदीसाठी हजारो ग्राहकांनी एकच गर्दी केली. लंडनमध्ये तर लांबच-लांबरांगा लागल्या होत्या.

सिमी राष्ट्रदोहीच! केन्द्र सरकार

नई दिल्ली, २१ ऑगस्ट- सिमी राष्ट्रदोही कारवाया करणारी दहशतवादी संघटना असल्याचे पुरावे केंद सरकारने बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर केले. गुजरातच्या बॉम्बस्फोट मालिकेमागे सिमीच असल्याचा दावा करीत सिमीवरील बंदी उठवण्याचा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केंदाने या याचिकेद्वारे मुख्य न्यायमूर्ती के.जी.बालकृष्णन यांच्या खंडपीठापुढे केली आहे.
अहमदाबादच्या बॉम्बस्फोट मालिकेमागे सिमीचा हात असल्याचा सबळ पुरावा गुजरात पोलिसांच्या हाती लागला. सिमीच्या १० कार्यर्कत्यांना अटकही झाली. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सिमी सध्या 'इंडियन मुजाहिदीन' या नावाने कारवाया करीत असल्याचे निष्पन्न झाले. या संघटनेने बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती केंद सरकारतफेर् बुधवारी सुप्रीम कोर्टाला दिली.
केंद सरकारने २००१ साली सिमीवर सर्वप्रथम बंदी घातली तेव्हापासून ती आजतागायत कायम आहे. दर दोन वर्षांनी केंद सरकार बंदीचा कालखंड वाढवल्याची अधिसूचना प्रसिद्ध करते. दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधिकरणाने तीन आठवड्यांपूवीर् सिमीच्या बाजूूने निकाल देताना बंदी कायम ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नसल्याचा निकाल दिला होता. सरकारने केवळ २००६ सालच्या मालेगाव येथील बॉम्बस्फोटांसंदर्भातील पुरावा न्यायाधिकरणापुढे मांडला, असे मत कोर्टाने व्यक्त केले होते. अलीकडेच राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले झाले. तेथील राज्य सरकारांनी बॉम्बस्फोट मालिकांमागे सिमीचा हात असल्याचा पुरावा केंदाला सादर करण्याची आवश्यकता होती. गुजरात पोलिसांनी तो पोहोचवताच केंद सरकारने सुप्रीम कोर्टात अपिलाद्वारे हे तपशील सादर केले. त्याची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होईल.

स्पेन विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५३

मेड्रीड, २१ ऑगस्ट- विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याने स्पेनमध्ये झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आज (गुरूवारी) १५३ वर पोहोचला आहे। स्पेनच्या सरकारी सूत्रांनी बुधवारी हा आकडा १०० सांगितला होता.
विमानात १७२ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते। त्यातील १९ जण बचावले आहेत.
बुधवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात घडला।
विमानाने बराजस विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करताच डाव्या इंजिनाने पेट घेतला.

विडिओकॉनला मंजुरी, राण्यांचो 'पोपट'!

मुंबई, ऑगस्ट- विडिओकॉनला नवी मुंबईतील सिडकोची २५० एकर जमीन देण्याच्या वादग्रस्त निर्णयाला कोणतीही चर्चा न होता मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. जमीन देण्याच्या निर्णयाने नारायण राणे आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातील या वादात राणेंचा पोपट झाला आहे.
विडिओकॉनला जमीन देण्याच्या निर्णयाबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक झाली। नारायण राणे यांच्या राजीनाम्याबद्दल काहीच निर्णय होत नसल्याने लांबणीवर पडलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज घेण्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ठरवले. त्यानुसार सकाळी १० वाजता ही बैठक सुरू झाली. मात्र, नाराज असलेले महसूलमंत्री या बैठकीला उपस्थित राहीले नाही.
त्यामुळे, विडिओकॉनला जमीन देण्याला कोणाचाही विरोध नाही, असे गृहीत धरून हा निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर करून राणेंचा 'पोपट' केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहून या प्रकरणी नाराज असल्याचे संकेत राणे यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे. तर राणे गैरहजर राहिल्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राणेंविरुद्ध कोलीत सापडले आहे.