मुंबई, २५ ऑगस्ट-सत्तेच्या हंडीतले लोणी मटकावण्यासाठी राजकारण्यांनाही डावपेचांचे थरावर थर लावावे लागतात, पण लक्ष्य साधण्यासाठी अचूक नेमही हवा. गेल्या काही वर्षांत दहिकाला उत्सवाचा नेम राजकारणी नेमका साधत आहेत. हा 'प्रसिद्धीचा उत्सव' साजरा करण्यासाठी नेत्यानेत्यांमधील चुरस कमालीची वाढू लागली आहे.
रविवारी या लढाईत महसूल मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांचे शहरात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपनगरांत वर्चस्व पहायला मिळाले. यंदा उत्सव मंडळांना राणे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बंड्या वाटल्या. राणेंचा फोटो आणि त्याखाली 'स्वाभिमानी नेता' असे लिहिलेल्या बंड्या घातलेली अनेक गोविंदा पथके शहरात फिरत होती. तर, राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्या शुभेच्छा देणारी होल्डिंग खूप ठिकाणी लावलेली होती. उपनगरांत मात्र गोविंदा पथकांच्या बंड्यांवर मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे यांचे नाव झळकत होते.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे या सर्वच राजकीय पक्षांनी उत्सव मंडळांना लाखोंची बक्षिसे जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन अहिर यांच्या 'संकल्प प्रतिष्ठान'च्या वतीने वरळीत दहीहंडी उत्सवाने मोठी गदीर् खेचली. तर, धारावीत शिवसेनेचे उपविभागप्रमुख मुथ्थू थेवर, मनोहर रायबागे यांनी उभारलेली एक लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी वडाळा येथील 'श्री साई सोशल ग्रुप'च्या गोविंदांनी फोडली. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची झुंबड उडाली होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी हजेरी लावली होती. लालबाग येथे आमदार दगडू सकपाळ यांनी उभारलेली ५१ हजार रुपयांची हंडी रात्री उशिरापर्यंत फुटली नव्हती. मात्र, ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १४० गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात झाल्याने गोविंदा खूष होते. मनसेच्या वतीने चेंबूरमध्ये ११ लाख ११ हजार रुपयांची हंडी उभारण्यात आली होती. शिवसेना भवनसमोर भारतीय विद्याथीर् सेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १ लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी अनेकांचे आकर्षण ठरली होती. बघ्यांच्या गदीर्मुळे ट्रॅफिक जॅम झाले होते.