मुंबई, ३० सप्टेंबर- महाराष्ट्र सरकारने मालेगाव बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना पन्नास हजार तर तुरळक जखमींना पंचवीस हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख युरोपच्या दौऱ्यावर असून स्फोटात जखमी झालेल्या पोलिसांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मालेगावात काल रात्री वर्दळीच्या भिक्कू चौक भागात झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला तर सत्तर जण जखमी झाले आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें