शुक्रवार, 15 अगस्त 2008

वाशी खाडी पूल १२ लेनचा!

ठाणे, १५ अगस्ट- शीव-पनवेल हायवेवर मानखुर्द-वाशीदरम्यान उभारण्यात आलेला दुसऱ्या वाशी खाडी पूल (ठाणे खाडी पूल) १२ लेनचा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नजीकच्या काळातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा त्यामागचा उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हा प्रस्ताव मांडला आहे. पुलाच्या रुंदीकरणाचे हे काम एमएसआरडीसी करणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती एमएमआरडीएकडे करण्यात आली आहे. या कामासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
शीव ते पनवेल रस्ता १४ लेनचा होणार आहे। त्यातील दहा लेन वाहतुकीसाठी, तर दोन्ही बाजूंना दोन-दोन लेनचे सव्हिर्स रोड असतील. या दहा लेनमधून धावणाऱ्या वाहनांची पुढे खाडी पुलावर कोंडी होऊ नये, यासाठी पुलाचे रुंदीकरण आवश्यक आहे. एमएमआरडीएचे चेअरमन या नात्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंजुरीनंतर पुलाचे रूंदीकरण मागीर् लागेल. टेंडर काढल्यापासून तीन वर्षात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या व शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे। मुंबई-पुणे एक्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. न्हावा-शेवा मार्ग झाल्यानंतर वाशी खाडी पुलावरून मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहणार आहे. नवी मुंबई-रायगडमध्ये उभारल्या जात असलेल्या १२ एसईझेडमुळे दहा लाख रोजगार निर्माण होणार आहेत. त्यातून वाहतुकीचा बोजा वाढणार, हे स्पष्ट असल्याने रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
पहिला वाशी खाडी पूल अपुरा पडू लागल्याने दुसरा पूल उभारण्याचे राज्य सरकारने एप्रिल १९८५ मध्ये ठरवले. त्याचे काम १७ फेब्रुवारी १९८७ रोजी सुरू होऊन ५ एप्रिल १९९७ रोजी पूर्ण झाले. त्यासाठी ११९ कोटी, ३७ लाख रु. खर्च आला. हा पूल उभारताना, सन २००१ मध्ये खाडी पुलावरून रोज एक लाख, १७ हजार, ८०० पॅसेंजर कार युुनिट वाहतूक होईल, असे अपेक्षित होते. नंतरच्या काळात त्यात मोठी वाढ झाल्याने पूल रुंदीकरण आवश्यक ठरले आहे.

मुंबईसाठी स्वतंत्र निधी द्या

मुंबई, १५ अगस्ट- मुंबईतील झोपड्यांचा प्रश्न मिटवण्यासाठीही मुंबईकडून केंदाला मिळणाऱ्या रकमेपैकी १० टक्के रक्कम महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे.
हा निधी मिळाल्यास मुंबईतील जुन्या बिल्डिंगांचा प्रश्न सोडवता येईल. तसेच पालिकेच्या शाळांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवता येतील, असेही त्यांनी सुचवले आहे. अमरनाथमध्ये होणारा संघर्ष टाळण्यासाठी अमरनाथ बोर्डाला संपूर्ण स्वायत्तता द्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे. या बोर्डाच्या कामकाजात राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वादग्रस्त जागा अमरनाथ बोर्डाला देण्यात यावी; अशी मागणीही त्यांनी या पत्रात पंतप्रधानांकडे केली आहे.

पुण्यातील मर्सिडिस बेंझ शाळेत "मनसे'कडून तोडफोड

पुणे १५ अगस्ट - स्वातंत्र्यदिनी हिंजवडी येथील मर्सिडिस बेंझ इंटरनॅशनल शाळेमध्ये ध्वजारोहण न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या शाळेत तोडफोड केली।
मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातील फर्निचरची आणि सुरक्षा रक्षकाच्या केबिनची तोडफोड केली. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संपूर्ण देशभरात शुक्रवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना बेंझ शाळेतील घटनेमुळे त्याला गालबोट लागले.

ठाण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान

ठाणे, १५ अगस्ट-राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या कार्यर्कत्यांनी शुक्रवारी नौपाड्यातील एका दुकानासमोर निदर्शने केल्यानंतर नौपाडा पोलिसांनी या दुकानमालकाविरोधात गुन्हा नोंदवला. स्नेहल शहा असे या दुकानमालकाचे नाव आहे.
गोखले रोडवर शहा यांचे इनर टच हे अंतर्वस्त्रांचे दुकान आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त या दुकानात करण्यात आलेल्या सजावटीत भारताच्या राष्ट्रध्वजाची प्रतिमाही तयार करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या जागी अंतर्वस्त्रांचा वापर करण्यात आला होता. या प्रकारामुळे खवळलेल्या रिपब्लिकन कार्यर्कत्यांनी या दुकानावर हल्लाबोल चढवला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कार्यर्कत्यांनी केलेल्या फिर्यादीनंतर नौपाडा पोलिस ठाण्यात दुकानमालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

साताऱ्यात एसटी बसची तोडफोड

सातारा, १५ अगस्ट - साताऱ्यातील मध्यवर्ती एस. टी. स्थानकावर शुक्रवारी सकाळी काही जणांच्या जमावाने बसगाड्या आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलची मोडतोड केली.
शहरात गुरुवारी एस. टी. बसखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच जमावाने ही मोडतोड केली असण्याची प्राथमिक शक्‍यता आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

पंतप्रधानांच्या भाषणावर अडवाणी नाराज

नवी दिल्ली, १५ अगस्ट - संसद सदस्यांना लाच देण्याच्या प्रकरणाचा उल्लेख स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील भाषणात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी न केल्याबद्दल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज (शुक्रवारी) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "या लाचखोरी प्रकरणामुळे लोकशाहीवरील विश्‍वासाला तडा केला आहे. हीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात होती,' असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
"दोनवेळा लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास डळमळीत झाला। पहिल्यांदा १९७५ मध्ये. जेव्हा, घटनात्मक अधिकारांचा दुरुपयोग करून आणीबाणी लादण्यात आली. तो स्वतंत्र भारताच्या इतिहासावरील डाग आहे. यावर्षी दुसरा डाग पडला. आपण आतापर्यंत निवडणुकांमध्ये पैशाचा वापर होत असल्याची तक्रार करीत होतो, तथापि, यावेळी थेट संसदेवर प्रभाव पाडण्यासाठी धनशक्तीचा वापर झाला,' अशी टीका अडवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, "पंतप्रधान आपल्या भाषणात या प्रकरणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती. अमरनाथ वादाचा उल्लेख त्यांनी केला असला, तरी याप्रकरणाचा उल्लेख करणे अत्यावश्‍यकच होते.'

बॉक्सिंगच्‍या प्रीक्वार्टर फाइनलमध्‍ये जितेंद्र

भारताच्‍या जितेंद्रकुमारने तुर्कीच्‍या उलास फुर्कान मेमिसचा तीनपेक्षा कमी फे-यांमध्‍ये पराभव करीत बॉक्‍सींगमध्‍ये ईवेट स्पर्धेच्‍या प्री क्वार्टर फाइनलमध्‍ये प्रवेश केला आहे.
ऑलम्पिकमध्‍ये पदार्पण करणारा जितेंद्रने जेव्‍हा तिस-या फेरीची सुरुवात केली त्‍यावेळी तो 13-2 ने पुढे होता. तर त्‍याचा प्रतिस्‍पर्धी मेमिस साफ बचावात्‍मक खेळ करीत होता. आशियन चॅम्पियनस स्‍पर्धेतील कास्य पदक विजेता असलेल्‍या जितेंद्रने सुरुवातीपासूच आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्‍पर्ध्‍याला हतप्रभ केले.