सोमवार, 11 अगस्त 2008

नाशिकला गोदाकाठच्या रहिवाशांना दक्षतेचा इशारा

नाशिक, ११ अगस्ट - नाशिक शहराजवळील सोमवारी दिवसभरात गंगापूर धरणातून २० हजार १७८ क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात आले आले तर आळंदी धरणातून ५४८८ क्‍युसेक्‍स पाणी सोडले जात आहे।
गंगापूर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याची पातळी वाढत असल्याने गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरीची पातळी वाढण्याची शक्‍यता असल्याचे जिल्हाधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील गोदाकाठच्या रहिवाशांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थितीच्या टप्प्यात न राहता, उंचवट्याच्या ठिकाणी रहिवाशांनी स्थलांतरित व्हावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान गंगापूर धरणाच्या परिसरात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात ७१ मि। मी. तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये १६७ मि.मी. पाऊस झाला. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक शहरातील रामकुंडाजवळ असलेल्या गोदावरीतील दूतोंड्या मारुती मूर्तीच्या डोक्‍यावरून पाणी वाहू लागले आहे.
गोदावरीच्या पातळीत होत असलेली वाढ आज सोमवारी सायंकाळीही कायम राहिली आहे। नाशिकपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या गोदावरीकाठच्या सायखेडा गावाजवळच्या पुलापर्यंत पुराची पातळी भिडली आहे. पुलावरून पाणी जाऊन पातळीत वाढ झाल्यास सायखेडा चांदोरीसह इतर गावांमधील पिके पूरबाधित होण्याची शक्‍यता आहे.आता सुरू असलेला पाऊस कायम राहिल्यास या परिसराला पुराचा वेढा पडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.
निफाडचे प्रांत रामदास खेडकर हे सायखेडा गावाकडे रवाना झाले आहेत. पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सायखेड्यात मुक्काम करण्याचे ठरविले आहे.

पूरस्थितीमुळे कल्याणमधील १५ गावांचा संपर्क तुटला

टिटवाळा, ११ अगस्ट - कल्याण तालुक्‍यातील उल्हास, काळू, भातसा आणि बारवी या चारही नद्यांना पूर आला आहे. या नद्यांवरील पाच महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्‍यातील १५ गावांशी संपर्क खंडित झाला आहे. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे घाबरून अणे गावातील अनेक कुटुंबांनी आज दुपारी स्थलांतर केले.
काल रात्रीपासून अविश्रांत कोसळत असलेल्या पावसाने आजही उसंत घेतली नसून, त्यामुळे कल्याण शहरातील घोलपनगर, अशोकनगर, शिवाजीनगर या वस्त्या जलमय झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांदिवलीत आश्रमात साध्वीची हत्या

कांदिवली, ११ अगस्ट-कांदिवली पश्चिमेकडील एका आश्रमात रविवारी पहाटे साध्वीची क्रूर हत्या झाल्याने खळबळ उडाली. कांदिवली स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या 'आनंदवन आश्रमा'त साध्वी चित्कलानंद (वय ४५) यांच्यावर तीन जबरदस्त वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पारमाथिर्क आश्ामात सारे हिशेब सांभाळणाऱ्या चित्कलानंद यांच्या हत्येनंतर आश्रमातीलच स्वामी पद्मनाभ (६५) हे फरारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून काशिकानंद स्वामी यांच्या या आनंदवन आश्ामात वास्तव्य करणाऱ्या चित्कलानंद या मूळच्या घाटकोपरच्या रहिवासी। संन्यास घेण्याआधीचे त्यांचे नाव चारुलता पटेल. त्या आश्रमात दाखल झाल्यानंतर काही काळाने आश्रमाच्या साऱ्या हिशेबांचे काम चित्कलानंद यांच्याकडे देण्यात आले. या हिशेबांवरून त्यांचा कायमच स्वामी पद्मनाभ यांच्याशी काही ना काही वादविवाद चालायचा, असे सांगण्यात येते. हा वाद भाजी वगैरे सामान आणताना स्वामी पद्मनाभ नीट हिशेब देत नाहीत, यावरून असायचा. स्वामी अफरातफर तर करत नाहीत ना, अशी शंका साध्वींना असायची. नेहमीच्याच विषयावरून दोन दिवसांपूवीर् दोघांचे भांडण झाले होते.
रविवारी पहाटे साध्वींची उजवी बरगडी, डाव्या खांद्याखाली आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या उघड होण्यापूवीर्च स्वामी पद्मनाभ आश्रमातून गायब झाले आहेत. कांदिवली पोलिस स्टेशनचे सीनिअर इन्स्पेक्टर सुरेंद जयस्वाल तपास करत आहेत.

औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या सभेत गोळीबार

औरंगाबाद, ११ अगस्ट - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता. ११) प्रश्‍न विचारणारे ऍड. सदाशिवराव गायके व नंदकुमार गांधीले यांना झालेल्या मारहाणीनंतर ऍड. गायके यांनी हवेत चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर ऍड. गायके यांनी व्यासपीठावर धाव घेत बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यावर रिव्हॉल्वर रोखले. व्यासपीठावरील इतरांनी त्यांना आवरल्यामुळे पाचवी गोळीही छतावर लागली.
जिल्हा बॅंकेची सभा साडेबाराला सुरू झाली। विषयपत्रिकेवरील सर्व विषय संपल्यानंतर अध्यक्षांनी मुदतीत प्रश्‍न दिलेल्यांना प्रश्‍न विचारण्याचे आवाहन केले. नंदकुमार गांधीले यांनी प्रश्‍न विचारल्यानंतर ऍड. गायके यांनी उभे राहून "मला बोलायचे आहे', असे सांगितले. त्यावर अध्यक्षांनी परवानगी नाकारली. ते म्हणाले, की ज्या माणसाने आजवर बॅंकेच्या विकासात सतत खेडा घातला, त्याला मी बोलू देणार नाही. तुम्ही खाली बसा. त्यावर श्री.गायके यांनी आपल्याला बोलू द्यावे, असा आग्रह धरला. सभागृहातील काही तरूणांनी ऍड. गायके यांना मारहाण सुरू केली.
सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला काहींनी श्री। गांधीले यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. त्यानं तर ऍड. गायके यांनी रिव्हॉल्वर मधून छतावर चार गोळ्या झाडल्या. गर्दी पांगल्यावर ते व्यासपीठाकडे धावले व त्यांनी सुरेश पाटील या ंच्यावर रिव्हॉल्वर रोखले. मात्र काही नेत्यांनी त्यांना बाजूला केले. त्यामुळे पाचवी गोळीही छतावर जाऊन आदळली. गोंधळातच सभेचे कामकाज संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
अर्धातासानंतर पोलिसांनी श्री. गायके यांना ताब्यात घेतले.

भारताला पहिलं गोल्ड मेडल!

बीजिंग, ११ अगस्ट-१० मिटर रायफल रायफल शुटिंग स्पर्धेत भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्डमेडल पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकच्या तिस-या दिवशी पदकाचं खातं उघडलं आहे. दिल्लीच्या २६ वर्षीय बिद्राने फायनलमध्ये प्रवेश केला होता.
बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळामध्ये भारताच्या वाट्याला आलेलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अभिनव बिंद्रा हा खेल रत्न पुरस्कार प्राप्त नेमबाज असून या स्पर्धेत रोमानियाचा जॉर्ज अॅलन मोल्डोव्हेनूसोबत त्याने फायनल मध्ये प्रवेश केला होता. दोघांनीही ६०० पैकी ५९९ स्कोर केला होता.
बिंद्राने फायनल स्पर्धेत १०० , ९९ , १०० , ९८ , १०० , आणि ९९ असा स्कोर केला होता। दरम्यान , फिनलन्डचा हेन्री हॅकीनेन याने ५९८ / ६०० असा स्कोर करून प्रवेश मिळवला.
१० मिटर एअर रायफल शुटिंग स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करताना अभिनव चौथ्या क्रमांकावर होता। अंतिम स्पर्धेत अभिनवने एकूण ७००.५ स्कोर करून गोल्ड पटकावले. तर चीनच्या झ्यू क्विनने ६९९.७ स्कोर करून रौप्य पदक आणि फिनलंडच्या हेन्री हक्कीन्सने ६९९.४ स्कोर करून कांस्यपदक पटकावले.
व्यक्तिगत पातळीवर यापूर्वी नेमबाज राजवर्धन राठोड याने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले होते।
१९८० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये मिळालेल्या गोल्ड मेडलनंतर भारताला मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.