नागपूर, १४ जुलाई-शहरातील दुचाकी वाहनचालकांना हेल्मट घालण्याची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत, या निर्णयाविरुद्ध आपण सविनय कायदेभंग करणार असल्याचे भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
२००३ मध्ये राज्य सरकारने हेल्मेट सक्तीचा आदेश काढला होता. मात्र महापालिका क्षेत्रात कॉमन सर्वानाच असा आदेश काढणे चुकीचे आहे, असे फडणवीस यांचे मत आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १२९ नुसार आयएसआय ट्रेडमार्कचे हेल्मेट वापरण्यास सांगण्यात आले आहे. तरीही हेल्मेट पूर्णपणे सुरक्षा देऊ शकत नाहीत, चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत जवळपास १० हजाराच्या घरात आहे, ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही.
सरकार स्कार्फ वापरण्यावर एकीकडे बंदी आणतेय तर दुसरीकडे संपूर्ण चेहरा झाकेल अशी हेल्मेट वापरण्याचा आदेश देतेय, हे सरकारच्या निर्णयाशीच विसंगत आहे. त्यामुळे या आदेशाचा सविनय भंग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें