मुंबई, दि. १५ : मुंबईत कमालीच्या पाणीटंचाईने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले असताना पाण्याचा हवा तसा वापर करून त्याची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीही न भरणाऱ्या पश्र्चिम व मध्य रेल्वेला यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
गेल्या महिन्यात पालिका आयुक्त जयराज पाठक यांनी स्वत: पश्र्चिम आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाणीपट्टी भरण्यासंबंधीचे छोटेखानी पत्र पाठवले होते. या पत्रात पश्र्चिम रेल्वेवर ४.१० कोटी तर मध्य रेल्वेकडून ३.५० कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले। मात्र अद्याप दोन्हीही रेल्वेकडून बिलाची रक्कम आलेली नाही. पालिकेकडून पश्र्चिम आणि मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानक, कारशेड आणि स्टाफ क्वाटर्सला पाणी पुरवठा केला जातो. मात्र आत्तापर्यंत एकदाही या दोघांनी पाणी बिलाची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे निर्धारित करून दिलेल्या वेळेत पश्र्चिम आणि मध्य रेल्वेकडून पाणीबिल भरले न गेल्यास पाणी पुरवठा रद्द करण्यात येईल असा इशारा जल अभियंता एम. एम. कांबळे यांनी दिला आहे.
तर भाजपाचे उत्तर मुंबई महासचिव विनोद शेलार यांनी रेल्वेचे मालाड, कांदिवली आणि दहिसर या तीन ठिकाणी क्वाटर्स असून येथे दर दिवशी १०० टॅंकर पाणी पुरवठा करतात. मात्र सध्या मुंबईत असलेल्या पाणी टंचाईमुळे या परिसरातही १०० पाण्याचे टॅंकर्स पुरेसे ठरत नाहीत. जर रेल्वेने पाणी पुरवठा करणे रद्द केल्यास भाजपानेते आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें