रविवार, 6 जुलाई 2008

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचे ३२ बळी

लखनऊ - गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि घरे कोसळण्याच्या घटनांमुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत ३२ जणांचा बळी गेला आहे।
राज्यातील सर्व मोठ्या नद्या दुथडी भरून वाहात आहेत. अयोध्येतील घागरा नदीची पातळी वाढत असून पलिंया कल्याण येथील शारदा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पूरग्रस्त २१ जिल्ह्यांसाठी २१ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.

कोई टिप्पणी नहीं: