गुरुवार, 17 जुलाई 2008

लाचलुचपत विभागाला ७ शासकीय कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

मुंबई, दि. १७ : बेकायदेशीररित्या मालमत्ता गोळा करणाऱ्या ७ शासकीय कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडे बेकायदेशीररित्या अवैध मालमत्ता जमवलेली असल्यास ती जप्त करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने निर्देशिलेल्या ७ शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील इन्स्पेक्टर बबन कदम याचा समावेश आहे. कदम याने एमपीएससी परिक्षा भरती प्रक्रियेत घोटाळा करून अवैध मालमत्ता मिळवली होती. त्याची १.५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर अन्य सहा जणांमध्ये सोलापूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या बाळाराम रोकडे (२०.३९ लाख), आरोग्य विभाग सहाय्यक संचालक, औरंगाबाद डॉ. भगवान चव्हाण (४३.२३ लाख रुपये), अहमदनगर येथील आरटीओ मोटर इन्स्पेक्टर सय्यद अब्दुल रहिम (१८.२७ रुपये लाख), लातूर येथील रमेश मेडगे (११.४२), नंदुरबारचा कृषी अधिकारी बबन पाटील (४०.५० लाख रुपये) आणि जालनाचे कृषी पर्यवेक्षक केदारनाथ बुधवंत (३०.१० लाख रूपये) आदींचा समावेश असून या सर्वांची एकूण ३.१८ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

कोई टिप्पणी नहीं: