रविवार, 10 अगस्त 2008

सीमा भागातील मोबाइल सेवा खंडित करणार

नवी दिल्ली, १० अगस्त- सीमाभागातील सुरक्षेचा विचार करून केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना सीमाभागावरील सेवा खंडित होणारी साधने बसवण्याचे आदेश दिले आहेत. सीमाभागावर वा सीमा भाग ओलांडेपर्यंत कोणत्याही मोबाइल कंपन्यांची सेवा उपलब्ध असू नये, असे आदेश सरकारतर्फे मोबाइल कंपन्यांना देण्यात आले आहेत.
मोबाइलचा वाढता वापर आणि त्याचा अतिरेकी करत असलेला वापर लक्षात घेऊन सुरक्षेचा उपाय म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमाभागापासून ५०० मीटर अंतरावर मोबाइलला यापूवीर्च बंदी घालण्यात आली होती. मात्र मोबाइल कंपन्या या नियमाची अमलबजावणी होते वा नाही याची तपासणी करण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळेच कंपन्यांना सेवा खंडित करणारे मशिन बसवणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं: