पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ईशान्येत पायाभूत सुविधांचा अनुशेष चिंताजनक असल्याचे स्पष्ट करून प्रदेशातील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेने जोडण्याची घोषणा केली.
त्यांच्याहस्ते पायाभूत सुविधांच्या प्रस्तावित योजनांच्या भविष्यातील आराखड्याचे अनावरण झाले। ईशान्येत हिंसाचारासोबतच विकास हा प्रमुख मुद्दा असला पाहिजे असे सांगून बंदुकीच्या टोकावर कोणत्याच समस्येची सोडवणूक शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
विकास हे ईशान्येचे घोषवाक्य असून हिंसेस आपला समाज व संस्कृतीत स्थान नाही। सर्व प्रश्न व समस्यांच्या चर्चेतून सोडवणुकीबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा अनुशेष सरकारसाठी प्रमुख चिंता आहे.
ईशान्येत विकासाची गंगा वाहण्यासाठी सर्व राज्याच्या राजधानीस रेल्वेसेवेने जोडण्यात येईल। येथे राबवण्यात येणार्या विकास प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा देण्यात आला असून विशेष आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ईशान्येसाठी एकतीस हजार कोटीचा महत्त्वाकांक्षी रस्ते निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी अकराव्या पंचवार्षिक योजनेत तरतूद करण्यात आली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें