बुधवार, 2 जुलाई 2008

एस.एम.कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार

मुंबई, दि. २ : शिवसेना दापोली पालगड विभागाचे विभागप्रमुख व गणपतीपुळे, टांगर या गावचे सुपुत्र एस.एम.कदम यांना ताडदेव जनता केंद्र, मुंबई येथे कामगार नेते व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याप्रसंगी मुकबधीर क्रिकेट संघाचे अध्यक्ष नामदेव कदम, हृदयरोगतज्ञ डॉ. वाघमारे, कामगार नेते श्याम म्हात्रे, समता ज्ञानदीप मंडळाचे संयोजक सुरज भोईर, अध्यक्ष विठ्ठल घोलप, चित्रपट क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्याच्या उन्नतीसाठी, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने समता गौरव पुरस्कार देण्यात येतो.
एस.एम. कदम यांनी गेल्या ५० वर्षामध्ये सर्व समाजामध्ये बंधुप्रेम कसे वाढेल व त्याची प्रगती कशी होईल म्हणून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या पूर्वीदेखील त्यांना जानेवारी २००७ रोजी राष्ट्रीय सन्मानरत्न ऍवार्ड, २३ एप्रिल २००७ राष्ट्रीय सन्मान ऍवार्ड, ११ एप्रिल २००८ महाराष्ट्र रत्न ऍवार्ड मिळाला आहे.
समाजामधील प्रत्येक व्यक्तिंना एस.एम.कदम नियमितपणे मदत करीत आले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजामध्ये त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं: