बुधवार, 2 जुलाई 2008

प्रेमभंगामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

मुंबई, दि. 3 : प्रेमभंगापायी स्वत:वरच तब्बल 20 वेळा चाकूने वार तसेच विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या मालाड येथील प्रेमवीराची सोमवारी अखेर जीवनाशी चाललेली झुंज संपली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालाड (प।) येथे राहणाऱ्या अन्सर अन्वर शेख या 18 वर्षीय तरुणाचे शेजारी राहणाऱ्या मुलीवर प्रेम होते. मात्र, त्या मुलीने अन्सरच्या प्रेमाला नाकारले. त्यामुळे प्रेमभंग सहन न झालेल्या अन्सरने 25 जून 2008 रोजी आपल्या शरीरावर चाकूने तब्बल 20 वेळा वार केले आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
अस्वस्थावस्थेत असलेल्या अन्सरच्या कुटुंबियांनी त्वरित त्याला बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार झाल्यानंतर अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे अन्सरची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर सोमवारी संपली. अन्सरच्या मृत्यूचे कारण स्पष्ट समजू शकले नाही. अन्सरच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूमागे हत्येचा संशय आपल्या पोलीस तक्रारीत व्यक्त केला आहे. मात्र मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अन्सरच्या आत्महत्येचे कारण नैराश्य असल्याचे प्राथमिक तपासात दिसत असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस जयवंत हरगुडे यांनी सांगितले. तर भगवती रुग्णालयाचे डॉ. के. एस. कल्याणकर यांनी अन्सरच्या मृत्यूमागे कोणत्याही व्यक्तीचा हात नसून ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं: