नवी मुंबई,दि.2: दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गटाराच्या पाण्याची पातळी वाढली असून त्यामध्ये एक लहान मुलगा वाहून गेल्याची घटना आज तुर्भे येथील इंदिरा नगर विभागात घडली.
गटार बंदीस्त नसल्यामुळे ही घटना घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले।तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरा नगर येथे राहणारा राहूल बाळू कसबे (5) हा खेळता खेळता घरासमोरील गटाराजवळ आला मात्र गटाराच्या पाण्याच्या पातळीत वाढ राहुलच्या लक्षात न आल्याने तो त्या गटारात पडला व वाहत वाहत जवळील झाडामध्ये अडकला. तात्काळ त्याची सुटका न झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना प्रशासनाने केलेल्या अपूऱ्या कामांमुळे झाली असल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये याकरीता प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून अपूरी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील काही नागरिकांनी केली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें