मुंबई, दि. १६ : ऐन पावसाळ्यात रेल्वेची सिग्नल यंत्रणा कोलमडते आणि मग अपघातांना निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे वॉटरप्र्रुफ सिग्नल बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरातील रेल्वेचे सिग्नल यंत्रणा कोलमडून जाते. याचा परिणाम लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. कधी कधी सिग्नलमधील बिघाडामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते. ही नवीन यंत्रणा डिजिटल ऍक्सेल काऊंटर्स म्हणून ओळखली जाणार असून जोपर्यंत लोकल स्थानकातून जात नाही तोपर्यंत हे सिग्नल लाल रंगच दाखवतील. हे नवीन सिग्नल मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात तसेच पश्र्चिम रेल्वेच्या काही स्थानकावर बसविण्यात येणार आहेत. जागतिक बॅंकेकडून यासाठी निधी उपलब्ध केला जाणार असून जर्मनीहून ते बनवून येणार आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें