मुजफ्फरनगर, दि. १६ : केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांनी सांगितले आहे की, अमेरिकेसोबत करार होईल व सरकारही अबाधित राहिल कारण देशाचा विकास व्हावा अशी सरकारची इच्छा आहे.
जायस्वाल सोमवारी संध्याकाळी 'किसान चौपाल'ला संबोधित केल्यानंतर पत्रकारांसमवेत चर्चा करत होते. त्यांनी मायावतींनी सीबीआयवर केलेल्या टिकेवर प्रतिकि"या व्यक्त करतांना सांगितले की, मुख्यमंत्री स्वतः सीबीआयला उत्तरप्रदेशातून प्रकरण पाठवून त्यावर आपला विश्र्वास व्यक्त करते पण त्यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआय चौकशी करते तेव्हा त्या त्यास राजकारणाने प्रेरित म्हणत त्यावर टीका करतात. जायस्वाल म्हणाले की, सीबीआयच्या कामकाजात सरकारचा कुठलाच हस्तक्षेप नाही. त्यांनी विश्र्वास व्यक्त केला की, सरकार चालेल व अमेरिकेसोबत अणुकरार सुद्धा होईल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें