मंगलवार, 8 जुलाई 2008

केंद्र सरकार अल्पमतात

नवी दिल्ली - डाव्या पक्षांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.
बहुमतासाठी आवश्‍यक असलेला २७२ चा आकडा कसा गाठायचा, असा प्रश्‍न आता सरकारपुढे उभा राहिला आहे. डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकसभा सदस्यांची संख्या ५९ ने कमी झाली आहे. या स्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारला ४५ खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
समाजवादी पक्षाचे लोकसभेत ३९ सदस्य आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला, तरी बहुमतासाठी २७२ चा आकडा गाठणे केंद्र सरकारसाठी अवघड ठरणार आहे. त्यामुळे सरकारला बहुमतासाठी अन्य सहा खासदारांचा पाठिंबा मिळवणे आवश्‍यक आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीत बहुजन समाज पक्ष काय भूमिका घेतो, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. बहुजन समाज पक्षाने विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी तटस्थ भूमिका घेतल्यास केंद्र सरकार वाचण्याची शक्‍यता अधिक आहे.

कोई टिप्पणी नहीं: