कळवा, दि ८ :ठाणे जिल्ह्यातील कळवा (पूर्व) कडील भागात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी विज पुरवठा करते. कळवा शिवाजी नगर, आनंद नगर, वाघोबा नगर या भागामध्ये प्रामुख्याने गेले दोन-तीन दिवसातून ४ ते ५ वेळा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याची ग्राहकांना पूर्व सूचना न देता सदर प्रकार चालू आहे. त्यामुळे शिवाजी नगर, आनंद नगर, वाघोबा नगर याभागातील रहिवासी नियमित वीज बील अदा करतात. तरी महावितरण कंपनी स्थानिक रहिवाशांवर अन्याय करीत आहे. विद्यार्थी वर्ग, गृहीणी, आजारी नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा स्थानिक नागरिकांचा विद्युत वितरण कंपनीवर रोष असून संबंधितांनी याची नोंद घ्यावी, अशी लोकांची मागणी आहे.
मंगलवार, 8 जुलाई 2008
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें