ब्लॉग लिहिण्याची 'लागण' आता सलमान खानलाही झाली आहे। अमिताभ बच्चन, आमीर खान यांच्यानंतर आता सलमान खानही ब्लॉग लिहिणार आहे.
सलमानचे वडिल सलीम खान यांनी बॉलीवूडचे अनेक हिट चित्रपट लिहिले आहेत। सहाजिकच सलमानलाही आपल्यातल्या लेखकाला जागे करायचे आहे. खरे तर त्याने याच्या आधीही लेखनाचे काही प्रयोग केले आहेत. त्याने अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्याच्याच एका कथेवर 'वीर' हा चित्रपट तयार होतो आहे. सलमानने लिखाणाला सुरवात केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका वेबसाईटवर त्याचे विचार वाचायला मिळतील, असेही ते म्हणतात.
सलमानचा एक टिव्ही शो' दस का दम'ही लवकरच सुरू होतो आहे. तो त्याच्या प्रचारात गुंतला आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये तो या चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें