शनिवार, 28 जून 2008

सोनियांकडून पंतप्रधानांची पाठराखण

अमेरिकेच्या अण्वस्त्र करारावरून सरकारमध्ये नाराजी आणि अनिश्चिततेचे वातावरण तर आहेच, परंतु महागाईदर वाढतच असल्याने विरोधक पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र पुन्हा एकदा मनमोहन यांची पाठराखण केली असून, तेच आज घडीला भारताचे नेतृत्व करू शकतात अशी पुस्तीही जोडली आहे।
यापूर्वीही महागाईदराने आठचा पल्ला गाठल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर विरोधकांनी जोरदार टिका केली होती, त्याही वेळी सोनियांनी मनमोहन हेच उत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे स्पष्ट केले होते।
आता महागाईदर 11.42 टक्क्यांवर गेल्यानंतर डाव्या पक्षांसह विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उडवली आहे. गेल्या चार वर्षात पंतप्रधान म्हणून मनमोहन यांनी घेतलेले निर्णय भारताच्या विकासासाठी पोषक असल्याचेही सोनिया म्हणाल्या.

कोई टिप्पणी नहीं: