महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी पाटी आंदोलनाने व्यापा-यांना दिलेली २८ ऑगस्टची तारीख आता अवघ्या एका दिवसावर आली आहे. असे असताना राज्य सरकार आणि महापालिकेने कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याने आपण कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मराठी पाट्या न लावणा-या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी मनसेचे मुख्यालय असलेल्या ' राजगड ' येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुंबईतील अनेक भागात २८ ऑगस्टच्या डेड लाइन दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठी पाट्या लागल्या आहेत. तसेच अनेकांनी मराठी पाट्या करायला टाकल्या आहेत. त्या पाट्या येईपर्यंत आंदोलन मागे घेतले आहे. तसेच दुकानादारांनी मराठीत पाट्या लावाव्यात , या संदर्भात महापालिका आदेश काढून कारवाई करणार आहे. त्यामुळे आता काही दिवस आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही कायम स्वरूपाची शांतता नाही. कशी कारवाई होत आहे. यावर आमची बारीक नजर आहे , असेही राज यांनी सांगितले.
राज्यात कायद्याची अमंलबजावणी होत नसेल तर हे सरकारचे अपयश आहे. नागपूरमध्ये महिलांनी गुंडाला ठार मारले. त्यांनी कायदा हाता घेतला , पण त्यांनी कायदा हातात का घेतला याच्या मागचं कारण लक्षात घेतले पाहिजे. सरकारचं जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येवू देते. सरकारने योग्यवेळी योग्य कारवाई केल्यास असे प्रकार घडणार नाही. कायदा हातात घेता म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना अटक करतात. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करतात. मूळात कायदे तोडतं कोण आणि हा कायदा आहे हे सांगायला जाणा-यावरच कारवाई का केली जाते , असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें