गुरुवार, 28 अगस्त 2008

मनसेची गुंडगिरी खपवून घेणार नाही

मुंबई, २९ ऑगस्ट-शिवसेना व मनसे यांनी मराठीचे श्रेय लाटण्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरू नये। ते खपवून घेतले जाणार नाही. मोडतोड, गुंडगिरी करणे हा कायदा राबवणा-यांचा मार्ग असू शकत नाही. जबरदस्तीने बोर्ड तोडणा-यांना पोलिस चोख उतर देतील, असे सांगत मुंबईत मनसेच्या ११३५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिस दल सक्षम आहे. त्यासाठी गुरुवार दुपारी चार वाजेपर्यंत मनसेच्या ११३५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यात प्रत्यक्षात ७२८ जणांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना तडीपार केले असून, १४९ जणांना वॉर्निंग नोटीस देण्यात आली आहे, याकडेही आर. आर. पाटील यांनी लक्ष वेधले.

कोई टिप्पणी नहीं: