कोल्हापूर - चोर असल्याच्या संशयावरुन राजस्थान समाजातील बारा तरुणांना अमानुषपणे माराहाण केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजता इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात घडली। जखमी तरुणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मंगळवारी पहाटे जमावाने हे तरुण राहात असलेल्या कारखाना परिसरात हल्ला केला। कोयता, तलवारी, दगडी पाटा यांनी या तरुणांना माराहाण करुन तेथे असलेल्या दुचाकी गाड्या, प्रापंचिक साहित्याचेही नुकसान केले.
या घटनेनंतर शहरातील राजस्थान समाजातील सुमारे दोन हजारहून अधिक नागरिकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. माराहाण करण्यांवर कारवाई करण्याची मागणी करुन बुधवारी उद्योग बंद ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें