नाशिक रोड - वीज पारेषण कंपनीच्या टॉवरमध्ये आज पुन्हा बिघाड होऊन शहरात बारा तासांहून अधिक काळ वीज गायब झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यासह उद्योग-व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सायंकाळी साडेपाचपर्यंत २०२४ तक्रारींची नोंद झाली होती.
वीज पारेषण कंपनीच्या आडगाव आणि टाकळी येथील उच्चदाब उपकेंद्रात मध्यरात्री अडीचच्या सुमारास बिघाड झाल्याने अर्ध्याहून अधिक नाशिकचा वीजपुरवठा खंडित झाला। पहाटे पाऊस सुरू झाल्याने त्यातून हा बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, वीज कंपनीचे या संदर्भात मौन कायम आहे. वीज गेल्याच्या तक्रारी सुरू झाल्यावर वितरण कंपनीने तातडीने वीजवाहिन्यांची तपासणी केली. त्यात पारेषण कंपनीच्या यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती पुढे आली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें