१३ अगस्त- बांग्लादेश सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जागरूक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असून 'बॉर्डर सील' करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या काळात दहशतवादी हल्ला होण्याच्या शक्यतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी मोठया प्रमाणावर सैन्यबळ या भागात लावण्यात आले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या सुत्रांनी सांगितले, की सीमेवर जादा सैन्यबळ तैनात करण्यात आले असून राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवाईचा विशेष धोका नसला तरीही गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार बांग्लादेशात आश्रय घेतलेले दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषा पार करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सीमेवरील 4 फुटीरवादी गटांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिवसावर बहिष्काराची घोषणा केली आहे. या भागात तपासणी अभियानही राबविले जात आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें