शनिवार, 23 अगस्त 2008

काश्‍मिर अशांतच, पुन्हा तीन दिवस "बंद'

श्रीनगर, २३ ऑगस्ट- (पीटीआय) : जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी शुक्रवारी ईदगाह मैदानावर मोठा मेळावा घेऊन शनिवारपासून पुन्हा खोऱ्यात तीन दिवसांचा "बंद' पुकारला आहे.
काश्‍मीर मुद्द्यावरून भारत, पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील नागरिकांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
""पुढील तीन दिवस काश्‍मीरमध्ये पूर्ण "बंद' पाळण्यात येईल. शांततापूर्ण मार्गाने आम्ही निषेध करू,'' असे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारुक यांनी सांगितले.
ईदगाह मैदानात फुटीरतावाद्यांचा जो मोठा मेळावा झाला त्यात हजारो लोकांनी हिरवे आणि काळे झेंडे दाखवले.
सोमवारी श्रीनगरच्या मुख्य लाल चौकात समितीतर्फे ठिय्या आंदोलनही केले जाणार आहे.

कोई टिप्पणी नहीं: