भारतीय गोलंदाजांना धू धू धुतल्यानंतर श्रीलंकेने 600 धावांचे लक्ष्य भारतीयांना दिले होते. पण त्याचा पाठलाग करताना ज्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंवर कर्णधार कुंबळेने विश्वास व्यक्त केला होता, त्यांनीच तंबूत परतून कुंबळेचा विश्वास श्रीलंकेच्या समुद्रात बुडवला. भारताची भक्कम फलंदाजी १४६ धावांवर ६ बाद अशी केव्हाही मान टाकेल अशा स्थितीत आहे.
आयपीएल लीगमध्ये झटपट धावा काढण्याची सवय लागलेले भारतीय फलंदाज आज सारे तंत्र विसरुन केवळ धावांच्या मागे लागल्याचे चित्र दिसत होते. यात पहिला बळी गेला तो, सेहवागचा. सेहवाग 25 धावांचे योगदान देत तो पव्हेलियनमध्ये परतला. त्याला कुलशेखराने तंबूत धाडले.
यानंतर सचिन आणि गंभीर यांच्याकडून भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा होत्या परंतु, तेही स्वस्तात तंबूत परतले. यापूर्वी भारताची भिंत अर्थात राहूल द्रविड कोसळला. नंतर गांगुली दादाही आल्या पावली परत गेला.
कार्तिकलाही मुरलीने परत पाठवल्यावर कर्णधार कुंबळे आणि लक्ष्मण आता मैदानावर टिकून आहेत. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची ६ बाद १४७ अशी अवस्था होती. आता भारतावर फॉलोऑचे संकट आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें