मुंबई - पाऊस लांबल्याने १५ टक्के पाणीकपात करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे सोमवारी सकाळी अक्षरशः लाखो लिटर पाणी वाया गेले.
सोमवारी पहाटे चार वाजता दादरमधील खोदादाद सर्कलजवळ मोठी जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला, पण जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी पालिकेला सकाळी नऊ वाजले.
पहाटे चार ते सकाळी नऊपर्यंत मोठ्या दाबाने पाणी रस्त्यावर आल्याने खोदादाद सर्कल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. जलवाहिनी फुटल्यामुळे माटुंगा, वडाळा, परळ आणि दादर परिसरातील घरांमध्ये सकाळी पाणी आले नाही. यामुळे येथील नागरिकांचे हाल झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ते झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने कळविले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें