नवी दिल्ली- देशातील वाढत्या महागाईचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी कॉग्रेस आणि मित्र पक्षांनाही फटका बसण्याची भीती दस्तूरखुद्द अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे।
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी ही भीती व्यक्त केली। महागाईदरावर नियंत्रण करण्यात सरकारला अपयश आल्याच्या आरोपांचा मात्र त्यांनी इन्कार केला.
महागाई वाढल्याची बाब जरी खरी असली तरी, सरकार अपयशी ठरल्याचा ठपका लावणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत देशातील नागरिक समजदार असल्याने त्यांना महागाईवाढीची नेमकी कारणे माहिती असल्याचे चिदंबरम म्हणाले।
आगामी काळात महागाईदर 10 टक्क्यांच्या आसपासच राहणार असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे।
महागाईच्या पुरात बाजार गेला वाहून अमेरिकी बाजारात झालेली विक्रमी पडझड, आणि महागाईदराने साडे अकराचा पल्लाही ओलांडल्यामुळे या नकारात्मक प्रवाहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी अक्षरशः वाहून गेला।
सत्राच्या आरंभीच अमेरिकी बाजारात झालेल्या पडझडीचे वृत्त बाजारात येऊन थडकल्याने बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली होती। यात बीएसईचा निर्देशांक 620 अंशांनी तुटत दहा महिन्यांनंतर बाजार 14 हजार अंशांखाली आला, तर नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्येही 179 अंशांची पडझड झाली.
बाजारावर इतका नकारात्मक परिणाम दिसून आला, की शेअर बाजारातील 30 पैकी एकाही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली नाही।
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 142 डॉलरच्या जवळपास जाऊन खेटल्याचा परिणामही बाजारावर दिसून आला. यातच महागाईदर वाढल्याने आणि तज्ज्ञांनी तो 12 टक्क्यांपर्यंत जाण्याच्या तयारीत असल्याचे भाकीत केल्याने दलाल स्ट्रीटवर निराशेची लाट आली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें