कोल्हापूर- दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी टेंबलाईवाडी येथील कामकार कंत्राटदार विजय बनसोडे व त्याचा मुलगा राहूल यांचे अपहरण करणाऱ्या सराईत गुंड काळू गायकवाडच्या चार साथीदारांना पोलिसांनी आज नाट्यमरित्या पकडले।
या वेळी पोलिसांवर जांबीयाने हल्ला करण्याचा प्रयत्न काही आरोपींनी केला। पोलिस व आरोपींच्यात झटापट झाली. या संधीचा फायदा घेऊन काळू पसार झाला.
पोलिसांनी विजय व राहूलची सुटका केली आहे. काळूने काल आपल्या साथीदारांसह विजय व त्याच्या मुलाचे अपहरण केले होते. काळू आपल्या साथीदारासह कणेरी मठाजवळील शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे चौघांना पकडले. काळू शेतात पळून गेल्यावर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी "कॉबींग ऑपरेशन' राबविले, पण काळू सापडला नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें