शनिवार, 16 अगस्त 2008

चंद ग्रहणाबद्दल गैरसमज नको

नाशिक, १६ अगस्त-रक्षाबंधन आणि चंदग्रहण एकाच दिवशी येत असले, तरी ग्रहणाचे वेध हे दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांपासून सुरू होत आहेत. त्यामुळे दुपारपर्यंतचा काळ हा शुभ आहे, त्यावेळेत पूजाअर्चा व रक्षाबंधन करण्यास काहीच अडचण नाही, असे आवाहन सनातन वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष भालचंद शौचे यांनी केले आहे.
शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंदग्रहण आहे। ग्रहण उत्तररात्री एक वाजून सहा मिनिटांपासून पहाटे चार वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. या ग्रहणाचे वेध शनिवारी दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांपासून लागतील. वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटण्यापर्यंतचा काळ कुठल्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाबाबतदेखील लोकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.
शनिवारी पहाटेपासून ते दुपारपर्यंतच्या वेळेत (वेधापूवीर्ची) पूजाअर्चा, जप, होमहवन, भोजन व रक्षाबंधनास काहीही अडचण नाही, असेही शौचे यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं: