ठाणे, १५ अगस्ट- शीव-पनवेल हायवेवर मानखुर्द-वाशीदरम्यान उभारण्यात आलेला दुसऱ्या वाशी खाडी पूल (ठाणे खाडी पूल) १२ लेनचा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नजीकच्या काळातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा त्यामागचा उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हा प्रस्ताव मांडला आहे. पुलाच्या रुंदीकरणाचे हे काम एमएसआरडीसी करणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती एमएमआरडीएकडे करण्यात आली आहे. या कामासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
शीव ते पनवेल रस्ता १४ लेनचा होणार आहे। त्यातील दहा लेन वाहतुकीसाठी, तर दोन्ही बाजूंना दोन-दोन लेनचे सव्हिर्स रोड असतील. या दहा लेनमधून धावणाऱ्या वाहनांची पुढे खाडी पुलावर कोंडी होऊ नये, यासाठी पुलाचे रुंदीकरण आवश्यक आहे. एमएमआरडीएचे चेअरमन या नात्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंजुरीनंतर पुलाचे रूंदीकरण मागीर् लागेल. टेंडर काढल्यापासून तीन वर्षात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या व शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे। मुंबई-पुणे एक्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. न्हावा-शेवा मार्ग झाल्यानंतर वाशी खाडी पुलावरून मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहणार आहे. नवी मुंबई-रायगडमध्ये उभारल्या जात असलेल्या १२ एसईझेडमुळे दहा लाख रोजगार निर्माण होणार आहेत. त्यातून वाहतुकीचा बोजा वाढणार, हे स्पष्ट असल्याने रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
पहिला वाशी खाडी पूल अपुरा पडू लागल्याने दुसरा पूल उभारण्याचे राज्य सरकारने एप्रिल १९८५ मध्ये ठरवले. त्याचे काम १७ फेब्रुवारी १९८७ रोजी सुरू होऊन ५ एप्रिल १९९७ रोजी पूर्ण झाले. त्यासाठी ११९ कोटी, ३७ लाख रु. खर्च आला. हा पूल उभारताना, सन २००१ मध्ये खाडी पुलावरून रोज एक लाख, १७ हजार, ८०० पॅसेंजर कार युुनिट वाहतूक होईल, असे अपेक्षित होते. नंतरच्या काळात त्यात मोठी वाढ झाल्याने पूल रुंदीकरण आवश्यक ठरले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें