मुंबई, २२ ऑगस्ट- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी करीमुल्ला खान याला येत्या २९ ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी विशेष "टाडा' न्यायालयाने दिले। करीमुल्ला खानला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली होती.
या बॉम्बस्फोटांच्या आधी रायगडमधील किनाऱ्यावर स्फोटके उतरवून घेण्यात आणि ते मुंबईपर्यंत आणण्यात खान याचा सहभाग होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बॉम्बस्फोटांनतर तो फरारी झाला होता. या काळात त्याने दाऊद इब्राहिमच्या कराचीतील निवासस्थानी काम केले होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें