मुंबईत दहीहंड्या गर्दीत, रस्त्यांवर न उभारता मोकळ्या मैदानांत उभाराव्यात, अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली आहे। रस्त्यांवरील मोठ्या दहीहंड्यांसाठी उसळणाऱ्या गदीर्त घातपात होऊ नये, यासाठी पोलिसांनी हा पर्याय पुढे केला आहे. तर, शहरात एवढी मैदाने तरी आहेत का, असा सवाल करीत दहीहंडी मंडळांसह त्यांच्या समन्वय समितीनेही त्यास विरोध दाखवला आहे.
मुंबईत दहीहंडीसाठी लाखो मुंबईकर, हजारो गोविंदा रस्त्यांवर उतरतात। सध्याची परिस्थिती पाहता त्याच्या सुरक्षेचे पोलिसांच्या मनावर आजच दडपण आले आहे. ठाणे, दादर, वरळी, अंधेरी, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या 'मोठ्या राजकीय' दहीहंड्यांना सुरक्षा व वाहतूककोंडी अशी कारणे दाखवून परवानगी देण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप दहीहंडी उत्सव मंडळे करू लागली आहेत.
' दहीहंडी काळात सुरक्षाव्यवस्थेचे मोठे आव्हान असेल। रस्त्यांवर चोहोबाजूने होणाऱ्या गदीर्वर नजर ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मोठ्या दहीहंड्या मैदानात लागल्यास सुरक्षेच्या दृष्टीने ते अधिक सोयीचे ठरेल. या संदर्भात दहीहंडी समन्वय समितीची येत्या आठवड्यात बैठक होईल. दहीहंडीला आमचा विरोध नाही. पण उत्सवातील उत्साहाचा कोणी गैरफायदा घेऊ नये; हे पाहणे आमचे काम आहे', असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांनी सांगितले.
त्याचवेळी, सुरक्षेचा मुद्दा पुढे करून पोलिस विनाकारण दहीहंडीत अडथळे निर्माण करीत असल्याचे दहीहंडी उत्सव मंडळांचे म्हणणे आहे। 'दहीहंडी उभारण्याएवढी मैदाने मुंबई, ठाण्यात आहेत का' असा सवाल करीत, रस्त्यावरील एकाही दहीहंडीला पोलिसांनी विरोध केल्यास आम्ही त्याचा विरोध करू, असे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन अहिर आणि कार्याध्यक्ष जितेंद आव्हाड यांनी सांगितले.
रस्त्यावरील दहीहंडीस बंदी आणण्यापेक्षा गदीर्च्या ठिकाणी लोकांनी, गोविंदा मंडळांनी काय खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन पोलिसांनी करावे. सुरक्षेची काळजी पोलिसांइतकीच आम्हालाही आहे; असे श्ाीदत्त माझगाव, जय जवान जागेश्वरी, सार्वजनिक उत्सव मंडळ ताडवाडी, जय भारत परेल या गोविंदा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें