शनिवार, 2 अगस्त 2008

दहशतवाद चिरडून काढण्याची गरज- पंतप्रधान

कोलंबो, 2 ऑगस्ट- दहशतवादाचा सामना करायचा असेल तर दहशतवाद आणि आशियाई देशांमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर दहशतवादा विरोधातील लढाई आणखी आक्रमक करण्याची गरज पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली। दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनांच्या संमेलनात ते बोलत होते.
दहशतवादा विरोधातील मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगतानाच यासाठी आता आक्रमकता आणि दृढ निश्चय करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले। बेंगलूरू, अहमदाबाद आणि काबुल मधील भारतीय दूतावासावर झालेले हल्ले हे अमानवीय कृत्य असल्याचेही मनमोहन यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाला चिरडून काढण्यासाठी सर्व आशियाई देशांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं: