शुक्रवार, 15 अगस्त 2008

मुंबईसाठी स्वतंत्र निधी द्या

मुंबई, १५ अगस्ट- मुंबईतील झोपड्यांचा प्रश्न मिटवण्यासाठीही मुंबईकडून केंदाला मिळणाऱ्या रकमेपैकी १० टक्के रक्कम महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे.
हा निधी मिळाल्यास मुंबईतील जुन्या बिल्डिंगांचा प्रश्न सोडवता येईल. तसेच पालिकेच्या शाळांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवता येतील, असेही त्यांनी सुचवले आहे. अमरनाथमध्ये होणारा संघर्ष टाळण्यासाठी अमरनाथ बोर्डाला संपूर्ण स्वायत्तता द्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे. या बोर्डाच्या कामकाजात राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वादग्रस्त जागा अमरनाथ बोर्डाला देण्यात यावी; अशी मागणीही त्यांनी या पत्रात पंतप्रधानांकडे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं: