मंगलवार, 12 अगस्त 2008

पुणे, ठाण्यातील भारनियमन रद्द

पुणे, १२ अगस्ट - पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, बारामती या शहरांतील भारनियमन रद्द करण्याचा निर्णय राज्य वीज वितरण कंपनीने मंगळवारी घेतला.
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे विजेची मागणी घटली आहे. शेती पंपांसाठी लागणाऱ्या विजेची मागणीही कमी झाली आहे. त्याचवेळी धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने वीज निर्मितीमध्ये सुधारणा झाली आहे. यासर्व परिस्थितीमुळे भारनियमन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औद्योगिक क्षेत्रासाठीचे भारनियमनही आता २४ तासांवरून १६ तासांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं: