मंगलवार, 12 अगस्त 2008

काश्‍मिरमधील हिंसाचारात पाच जणांचा बळी, सात पोलिस जखमी

श्रीनगर, १२ अगस्ट- सुरक्षा दल आणि आक्रमक झालेले आंदोलक यांच्यातील चकमकीत पाच जण ठार झाले आहेत.
काश्‍मिरमधील दहाही जिल्ह्यात लागू केलेली संचारबंदी मंगळवारीही कायम आहे।
सोमवारी "हुरियत'चे नेते शेख अब्दुल अझीज पोलिसांच्या गोळीबारात बळी पडल्यानंतर येथील परिस्थिती अजूनच चिघळली आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर अनेक संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. हुरियतच्या नेत्यांना स्थानबद्धतेतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान लासजन भागात आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या जावेद मुस्तफा मीर यांच्या खासगी सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून "अपघाताने' सुटलेल्या गोळयांनी सात पोलिस जखमी झाले. यांत महेश कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

कोई टिप्पणी नहीं: